कोल्हापूर : आपले सरकार केंद्र केंद्र सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी केले आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत ३१ आॅक्टोंबर पर्यंत असल्याची माहितीही गलांडे यांनी दिली.
राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, नागरी सुविधा केंद्र तसेच संग्राम केंद्र यांना आपले सरकार सेवा केंद्र हे नाव देवून सर्व सार्वजनिक सेवा केंद्राचे एकसारखे नामकरण केले आहे. प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयातील सेतूच्या ठिकाणी करवीर तालुका वगळून आपले सरकार केंद्र स्थापन केले जाणार आहे. यासाठी 1 ते 31 मार्च पर्यंत अर्ज करण्यात आले होते.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कामास 27 मार्चला स्थागिती दिली होती. आता उद्यापासून 31 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा अर्ज करता येणार आहेत. इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://kolhapur.gov.in या संकेतस्थळावरु अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन घ्यावा. अर्ज दिलेल्या मुदतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वेळेत स्वीकारण्यात येतील.
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.