बेळगाव - कर्नाटकासह महाराष्ट्रात जलाशयांतील पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही राज्यातील समन्वय वाढवून महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना काही दिवसांसाठी येथे नियुक्त केले जावे. शिवाय महाराष्ट्रातील जलसंपदा विभागामध्ये कर्नाटकातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जावी. यामुळे संभाव्य पूरस्थिती नियंत्रणाखाली ठेवणे शक्य होईल, असे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.
संभाव्य पूरस्थिती आणि कोरोनाचा आढावा पालकमंत्री जारकीहोळी यांनी आज (ता.7) घेतला, यावेळी ते बोलत होते. जारकीहोळी म्हणाले, "पाणी पातळी वाढल्यानंतर महाराष्ट्र त्वरीत पाणी सोडते. यामुळे पुढील काही दिवस लक्ष ठेवावे. कोयना, आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा. जलाशयातील पाण्यांचा उपयोग पहिल्यांदा तलाव भरून घेण्यासाठी केला जावा. त्यानंतर पाणी पुढे सोडावे. अतिवृष्टी व पूरस्थिती संदर्भात मुख्यमंत्री खूप गंभीर आहेत. यामुळे अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी.''
जारकीहोळी पुढे म्हणाले, "कोरोना आणि पुराचा धोका नियंत्रणाखाली ठेवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर आहे. महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात आल्याचे कळाल्यानंतर ते लगेच पुढे सोडले जावे. त्यामुळे पूरस्थिती ओढविणार नाही. बियाणे, खताचा तुटवड्याबाबत माहिती दिल्यास संबधीत मंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविले जातील.''
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यावेळी म्हणाले, "पुरासाठी तालुका, विभाग पातळीवर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संभाव्य धोका असलेल्या गावांना भेट दिली आहे. गेल्यावर्षी जेथे चारा छावणी, गोशाळा होत्या. तेथे परत केंद्र सुरु केली जातील.''
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी म्हणाले,""बेळगाव शहरात पुराचा धोका ओढविणार नाही, त्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच कोरोना नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी दर 2 दिवसांनी बैठक बोलवावी. संघ, संस्थांकडून बेडची व्यवस्था करण्याची तयारी दाखविल्यास त्वरीत परवानगी द्यावी. खासगी रुग्णालयात सीसीटीव्ही बसविले जावे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोरोनावर देखरेख ठेवावी.''
जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. अतिरिक्त व्हेंटिलेटर शासनाकडून प्राप्त झाले असून, बिम्स व तालुका रुग्णालयात मागणीनुसार पुरवठा सुरु आहे. रॅपिड अँटीजेन किटसह दररोज एक हजार लोकांचे नमुना घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे पण वाचा -
पोलिस आयुक्त त्यागराजन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा आरोग्य अधिकारी एस. व्ही. मुन्याळ आदींसह अधिकारी उपस्थित होते.
चाचण्या वाढवा
जिल्ह्यात सुरवातीला 3 महिने मृत्यूची नोंद नव्हती. त्यानंतर संख्या वाढत आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा सचिव एल. के. अतिक यांनी दिली. प्रभाग पातळीवर समित्यांची स्थापना केली जावी. चाचण्या वाढवल्या जाव्यात. त्यामुळे प्राथमिक पातळीवर रोग निदान होईल व उपचार सुरू करणे सुलभ ठरेल, अशी माहिती दिली.
संपादन- धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.