कोल्हापूर - खालसा कोळिंद्रेत हत्तीकडून पिकाचे नुकसान
चंदगड - खालसा कोळिंद्रे (ता. चंदगड) परिसरात आठ दिवसांपासून चार हत्तींचा वावर आहे. भात व ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. शिवारातील बहुतांश भात पीक कापणीला आले आहे; परंतु हत्तींच्या भीतीने कापणी, मळणीच्या कामात व्यत्यय आला आहे.
कोकण सीमेवर वावरणारा चार हत्तींचा कळप आठ दिवसांपासून खालसा कोळिंद्रे परिसरात दाखल झाला आहे. दिवसा गावालगतच्या डोंगरात त्यांचा मुक्काम असतो. सायंकाळ झाली की ते शिवारात उतरतात. कापणीला आलेले भात, खळ्यावर मळून ठेवलेले भात तसेच ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. आठ दिवसांपासून नुकसानीचे सत्र सुरूच आहे. वन विभागाकडून नुकसानीचे तत्काळ पंचनामेही सुरू आहेत. परंतु कष्टातून उभारलेले पीक उद्ध्वस्त झालेले पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. काल संदीप गावडे, कृष्णा गावडे, शंकर कुराडे, गुंडू कुराडे, इंद्रजित अनगुडे, सुभाष देसाई, भीमराव देसाई यांच्या शेतातील भाताचे व उसाचे नुकसान झाले आहे. हतींचा वावर नागरिकांत भीतिदायक असून त्याचा शेती कामांवर परिणाम झाला आहे. सध्या या विभागात भात कापणीचा हंगाम असून या हत्तींना हुसकवायचे कोठे, असा प्रश्न वन विभागापुढे आहे. गस्ती पथकाकडून हतींच्या हालचालीवर पाळत ठेवली जात आहे. सुरबाण, फटाके फोडून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्नही आहे. नागरिकांनी शेताकडे जाताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी केले आहे.
हे पण वाचा - बेटिंग घेणाऱ्या सात जणांना अटक ; इचलकरंजीत दोन छापे
सध्या भात कापणीचा योग्य हंगाम आहे. उशीर झाल्यास भाताची प्रतवारी खालावते. लोंबे गळून जमिनीवर पडतात. हत्तींच्या भीतीने कापणी थांबली असली तरी उशीर झाल्यास नैसर्गिकरीत्या भाताचे नुकसान होणार आहे.
संदीप गावडे, शेतकरी, खालसा कोळिंद्रे ळ चौक), सुरेश शिवशंकर माळी (तोडकर मळा), शकिल मेहबुब चुवेवाले (बांबू गल्ली) यांना अटक केली. मुख्य संशयित नादीर शेख (रा. मिरज) पसार झाला आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.