कोल्हापूर - "" संसदेत बनविलेली शेतकरी विरोधी विध्येयक रद्द करावीत या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती तर्फे येथील बिंदू चौकात विध्येयकांची प्रतीची होळी करण्यात आली.
किसान संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक नामदेव गावडे म्हणाले की, "" थंडीच्या कडाक्यातही दिल्लीतील आंदोलनात राज्यातील व कोल्हापूरातील शेतकरी नेटाने सहभागी झाले. कोणत्याही संकटे झुगारून हे आंदोलन अभूतपूर्व होत आहे. तरीही केंद्र सरकारने विध्येयक माग घेतलेले नाही, म्हणून या विध्येयकाची होळी करीत आहोत. त्यासोबत वाढीव वीज बिलामुळे वीज ग्राहक हैराण झाल्याने वीज बिलांचीही होळी करीत आहोत.''
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतिशचंद्र कांबळे म्हणाले की, "" सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही कायदे स्थगित केले. केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मागणीचा पाझर फुटावा अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने हे कायदे मागे घेतले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल याची दखल केंद्र सरकारने घ्यावी.''
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत यादव म्हणाले की, "" या आंदोलनाच्या निमित्ताने शेतकरी व कामगारांची एकजूट झाली आहे. त्यामुळे आत्ता तरी सरकारने शहाने होऊन शेतकरी विरोधी विध्येयक मागे घ्यावे तसेच राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वीज विध्येयक मागे घ्यावे.''
यावेळी चले जाव चले जाव मोदी सरकार चले जाव, दादागिरी नही चलेगी नही चलेगी, अन्यायकारक शेतकरी विध्येयक मागे घ्या आदी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी संभाजी जगदाळे, अनिल चव्हाण, रवी जाधव, डॉ. टी. एस. पाटील, शंकर कटाळे, कुमार जाधव, सुभाष सावंत, रमेश वडणेकर, मुकुंद वैद्य, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते.
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.