अतिवृष्टी, महापुरातील नुकसानीचे उर्वरीत 42 कोटी आले हो...!

floods have caused the remaining 42 crores ...!
floods have caused the remaining 42 crores ...!

कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरात झालेल्या नुकसान भरपाईसाठी कोल्हापूर जिल्ह्याकरिता उर्वरित 42 कोटी रुपये निधी मंजूर झाला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी याविषयी पाठपुरावा लावून धरला होता. राज्य सरकारकडून मिळालेल्या या मदतीमुळे गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात हैराण झालेल्या महापूरग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. 


गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महापुराने थैमान घातले होते. या अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत जिल्ह्याला 692 कोटी रुपये जमा झाले आहेत. यातील 42 कोटी रुपयांचा टप्पा शिल्लक राहिला होता. 

याबाबत मुश्रीफ म्हणाले, ""महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द तंतोतंत पाळला आहे. कोरोना संकटामुळे राज्य आर्थिक संकटात असतानाही प्रसंगी सरकारने कर्ज काढून बळिराजाला सावरण्यासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. कुणी काहीही म्हणोत, यावरून राज्यातील शेतकरीच आमच्या सरकारच्या केंद्रस्थानी आहे, याची प्रचीती येते.'' 

मिळालेला निधी असा 
- पीक नुकसान भरपाईसाठी ः 32 कोटी 
- पडझड झालेल्या घरांसाठी ः 7 कोटी 
- बारा बलुतेदार, छोटे व्यावसायिक : एक कोटी 48 लाख 
- एकरकमी घरभाडे प्रदान ः 70 लाख 
- पडझडीतील गृहोपयोगी साहित्याचे नुकसान ः 30 हजार 
- गोठ्याची पडझड : 80 हजार 

संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com