पंचगंगा नदी आता प्रदुषणमुक्त होणार  

Functional framework for Panchganga river pollution
Functional framework for Panchganga river pollution

इचलकरंजी  (कोल्हापूर) : केवळ कागदोपत्री आराखडा न करता इचलकंजी शहर आणि परिसरातील गावातून पंचगंगा नदीत एक थेंबही सांडपाणी मिसळू नये यासाठी कृतीशील कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम अंमलात आणण्यात येणार असून पंचगंगा प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने याबाबत पाठपुरावा करीत कृतीशील कार्यक्रमाला बळ दिले आहे. 

त्यामुळे इचलकरंजी सह कबनूर चंदुर खोतवाडी तारदाळ यड्राव या गावातूनही सांडपाणी नदीत मिसळणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर इचलकरंजी शहरातील विविध ओढ्यातून दिसणाऱ्या सांड पाण्याबाबत ही उपाययोजना करण्यात येणार आहेत. 
इचलकरंजी शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मला शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र या केंद्रातील प्रक्रिया विभागात साठलेला गाळ काढण्यात आलाच नाही. त्यामुळे या केंद्राची क्षमता कमी झाली आहे .गाळ काढल्यास हे संयंत्र अधिक चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. त्याबाबत पालिकेस योग्य त्या सूचना देण्यात आले आहेत. इचलकरंजी शहरात दररोज 40 दशलक्ष लिटर सांडपाणी बाहेर पडतील यातील 20 दशलक्ष लिटर वगळता अन्य सांडपाणी याद्वारे नदीत मिसळते शहरातील पाच ओढ्यामध्ये मिसळणारे हे पाणी ठिकाणी बंधारे सह आणि उपायोजना करत त्याची तीव्रता कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात यामुळेही पंचगंगा नदीत दूषित पाणी मिसळण्याचे प्रमाण कमी होणार आहे. 

पार्वती औद्योगिक वसाहतीतील काही उद्योगाच्या बाबतीत प्रदूषणाच्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे .त्याच बरोबर इचलकरंजी शहरातील छोट्या छोट्या रंगणी उद्योग ठिकाणचे पाणी दररोज टॅंकरद्वारे एकत्रित करून हे पाणी सीईटीपी मध्ये सोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सीईटीपी मधून एक थेंबही पाणी विनाप्रक्रिया बाहेर पडू नये याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळावर देण्यात येणार आहे .कबनूर चंदुर सह परिसरातील पाच गावाच्या लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गावातील सांडपाणी नदीत मिसळणार नाही याबाबत विविध उपाययोजना तातडीने सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही याप्रश्नी अत्यंत गांभीर्याने कृतीबाबत लक्ष ठेवून आहेत त्यामुळे नजीकच्या काळात इचलकरंजी शहर आणि परिसरातील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी जास्त प्रदूषित होणार नाही याबाबत कार्यवाही होणार आहे. 

इचलकरंजी आणि परिसरातील गावामध्ये पंचगंगा नदी पात्रातील पाण्याची दूषित पाण्याची तीव्रता अधिक राहते ही तीव्रता कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरु करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सर्वच घटकांनी याबाबत जागरूकपणे प्रतिसाद दिल्यास नक्कीच प्रदुषणाची तीव्रता कमी करण्यास मदत होईल 
- उदय गायकवाड, सदस्य उच्च न्यायालय नियुक्त पंचगंगा प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com