ग्रामपंचायत आली नाहीतर प्रदेशाध्यक्षपद काय कामाचे? ; ना.मुश्रीफांचा चंद्रकांतदादांना टोला 

gram panchayat result 2021 maharashtra kolhapur hasan mushrif chandrakant patil
gram panchayat result 2021 maharashtra kolhapur hasan mushrif chandrakant patil

कोल्हापूर  : राज्याचे राजकारण करत असताना ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या राजकारणावरही लक्ष असावे लागते. छोट्या निवडणुका म्हणून त्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. गावच्या निवडणुकीलाही फार महत्व आहे. मोठ्या नेत्याच्या गावाची निवडणुकीची चर्चा ही होतच असते. त्यामुळे गावची ग्रामपंचायत ज्याला आणता येत नाही त्याचे प्रदेशाध्यक्षपद काय कामाचे, असे कार्यकर्तेच विचारत राहतात, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना लावला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच सदस्यांना रस्ते विकासासाठी 25 लाख रुपये देणार असल्याचीही घोषणा केली. 

जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (ता.22) होणार असून त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अल्पकाळ ना.मुश्रीफ हे जिल्हा परिषदे आले होते. यावेळी ते बोलत होते. 

ना. मुश्रीफ म्हणाले, खानापूर ग्रामपंचायतीच्या निकालाने भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांतदादांची चर्चा सुरु झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही याची चर्चा करत असतात. ज्याला स्वत:ची ग्रामपंचायत जिंकता आली नाही त्यांचा सल्ला कसा ऐकायचा, असा प्रश्‍नही कार्यकर्ते विचारत असतात, असा टोला ना.मुश्रीफ यांनी लावला. यावेळी भाजपचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेते विजय भोजे, प्रसाद खोबरे, स्मिता शेंडुरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. 

नेतृत्व मानायचे कसे, असा प्रश्‍नही सदस्य उपकरतात. जर ग्रामपंचायतीत विजय मिळाला नाहीतर प्रदेशाध्यपद काय कामाचे, असा टोला ना.मुश्रीफ यांनी लावला.छोट्या निवडणुकीतील पराभवाचीच चर्चा खूप होते आणि ती त्रासाचाही असते, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी लावला. श्री.पाटील यांच्या खानापूर ग्रामपंचायतीत शिवसेनेची सरशी झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना ना.मुश्रीफ बोलत होते. 

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीत धक्‍कादायक निकाल लागले आहेत. प्रत्येक सदस्याला 25 लाख रुपये देण्याची घोषणा शासनाकडून. या हेडखाली डीपीडीसी ) 5054 रस्ते दुरुस्ती , ब गट आणि विशेष दुरुस्ती या अंतर्गत 

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सदस्याला 25 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. विशेष रस्ते दुरुस्ती योजनेंतर्गत (3053 ब गट)हा निधी दिला जाणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.  


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com