बेळगाव - महाराष्ट्रासह अन्य राज्याहून येणाऱ्यांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सक्ती रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी 14 दिवस होम क्वारंटाईन असणार आहे. परराज्याहून कर्नाटकाला येणाऱ्यांसाठी सुधारीत नियमावली आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आली असून, त्यात संस्थात्मक क्वारंटाईनची अट मागे घेतली आहे.
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी परराज्याहून येणाऱ्यांसाठी संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक होते. आता नियमात बदल करण्यात आले आहे. संस्थात्मक क्वारंटाईनची अट मागे घेतली आहे. यामुळे महाराष्ट्राहून कर्नाटकात येणाऱ्यांसाठी सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईन आणि सात दिवस होम क्वारंटाईन संदर्भामध्ये असलेली अट मागे घेतली आहे. त्याजागी 14 दिवस होम क्वारंटाईन सक्ती करण्यात आली आहे. सुधारित नियमावली 8 जुलैपासून लागू केली जाणार आहे.
क्वारंटाईन नियमावली सातत्याने बदलते. अनलॉकमध्ये क्वारंटाईन नियमात बदल केले आहेत. यामध्ये आता सरसकट होम क्वारंटाईची सक्ती मागे घेण्यात आली आहे. 26 जुलैपर्यंत सुधारीत नियम लागू असणार आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. महाराष्ट्र, अन्य राज्यामधून येणाऱ्यांसाठी सेवा सिंधूवर ऑनलाईन अर्ज करणे जरुरी आहे. पण, अर्ज केल्यानंतर अनुमतीची गरज नाही, असे कळविले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.