"इंद्रायणी'चे क्षेत्र वाढले; पण दर घसरले

 "Indrayani's Area Increased; But Rates Fell Kolhapur Marathi News
"Indrayani's Area Increased; But Rates Fell Kolhapur Marathi News

आजरा : तालुक्‍यात यंदा "इंद्रायणी' जातीच्या भाताचे क्षेत्र वाढले आहे. त्याचबरोबर उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले आहे; पण व्यापाऱ्यांकडून भाताची कमी दराने मागणी होऊ लागल्याने शेतकरी भात बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्यासाठी उत्सुक दिसत नाहीत. त्यामुळे बाजारपेठेत भाताची आवक घटली असून शेतकऱ्यांकडे भात पडून असल्याचे चित्र आहे. 

या काही वर्षात इंद्रायणी भाताची बाजारपेठेत मागणी वाढली आहे. सुवासिक व चवदार तांदूळ असल्याने ग्राहकांकडून इंद्रायणीची मागणी होत आहे. या तांदळाला चांगला दर मिळतो आहे. त्याचबरोबर तालुक्‍यातील हवामान "इंद्रायणी'साठी पोषक असल्याने उत्पादनही चांगले मिळते. त्याचबरोबर या काही वर्षांत महाबीजने इंद्रायणीचा तालुक्‍यात बीजोत्पादन कार्यक्रम राबविला. त्यालाही शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परिणामी "इंद्रायणी' जातीच्या लागवडीकडे तालुक्‍यातील शेतकरी वळला.

त्यामुळे तालुक्‍यात इंद्रायणीच्या भाताचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. यंदा 2 हजार हेक्‍टरवर भाताची लागवड झाली. या काही वर्षांत व्यापाऱ्यांकडून इंद्रायणीला मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागल्याने यंदाही इंद्रायणीची बाजारपेठ स्थिर राहील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती; पण व्यापाऱ्यांकडून कमी दराने भाताची मागणी होऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात बाजारात आणण्यास उत्सुकता दाखवलेली दिसत नाही. त्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत भाताची आवक घटल्याचे चित्र आहे. काही दिवसांनंतर तरी भाताचा दर वाढेल या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. 

दृष्टिक्षेपात 
आजरा तालुक्‍यातील भाताचे क्षेत्र*9 हजार 600 हेक्‍टर 
इंद्रायणीचे क्षेत्र*2 हजार हेक्‍टर 

शेतकऱ्यांकडे ग्राहकांची मागणी
ग्राहकांकडून इंद्रायणी जातीच्या भाताची मागणी कायम आहे; मात्र व्यापाऱ्यांकडून दर पाडून भाताची खरेदी होत आहे. यामध्ये शेतकरी भरडला जात आहे; पण घरगुती तांदूळ काढून विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडे ग्राहकांची मागणी आहे. मागणी व पुरवठ्यात विशेष तफावत दिसत नाही. 
- सूर्यकांत दोरुगडे, प्रगतशील शेतकरी, सोहाळे. 

1900 रुपये क्विंटलने मागणी
सुवासिक व चवदार तांदूळ असल्याने या भाताला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. तालुक्‍यात भाताचे क्षेत्र यंदा वाढले आहे. या काही वर्षांत भाताची प्रति क्विंटल 2200 रुपये दराने विक्री होत होती. यंदा मात्र 1900 रुपये क्विंटलने व्यापाऱ्यांकडून मागणी होत असल्याचे शेतकरी सांगतात. 
- मनोहर पाटील- कृषी पर्यवेक्षक, आजरा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com