कोल्हापूर - : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक खाईत आणि गुलामगिरीत लोटणारे कृषी विधेयक तात्काळ रद्द करावे. तसेच, या कायद्या विरोधात देशातील शेतकरी निदर्शने व आंदोलन करीत आहेत, या आंदोलनास पाठिंबा म्हणून कोल्हापूर जिल्हा कॉंग्रस कमिटीच्यावतीने स्टेशनरोडवर निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारविरूध्द जोरदार घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज कॉंग्रेस कार्यर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री व कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यत आले.
यावेळी, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रदेश कॉंग्रेसचे सदस्य गुलाबराव घोरपडे, सारंगधर देशमुख, महिला अध्यक्ष संध्या घोटणे, जिल्हा सचिव संजय पोवार-वाईकर, भरत रसाळे, किशोर खानविलकर, महंमद शेख, संपत पाटील,सुरेशराव कुराडे, विक्रम जरग, ए, डी,गजगेश्वर, प्रदीप चव्हाण,प्रमोद बुलबुले, संग्राम गायकवाड, उज्वला चौगले, हेमलता माने,पूजा आरडे, लीला धुमाळ,शुभांगी साखरे,प्रदीप शेलार,रणजित पोवार, रंगराव देवणे,तौफिक मुल्लानी, उमेश पोर्लेकर, मंगल खुडे, विजयनंद पोळ,सरफराज रिकीबदार, तानाजी लांडगे, बाळासाहेब सरनाईक, बाळासाहेब जगदाळे उपस्थित होते.
हे पण वाचा - खून प्रकरणी दोघा सख्या भावांना आजन्म कारावास
जोरदार घोषणाबाजी
केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना आपली शेती करता येणार नाही. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार नाही, अशी परिस्थिती असताना सरकारने हे कायदे तात्काळ मागे घेतले पाहिजे, अशी मागणही करत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली.
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.