चंदगड : अडकूर- इब्राहीमपूर मार्गावर शिरोली (ता. चंदगड) फाट्यानजीक वाण्याच्या ओढ्यावरील मोरीत गाळ साचल्यामुळे पाणी जाण्यास वाव नाही. थोडा जरी पाऊस झाला तरी ओढ्याचे पाणी रस्त्यावरुन वाहते. गतवर्षी सुमारे दीड महिना पाणी रस्त्यावरुनच वाहत होते. मोठ्या पावसात या पाण्यामुळे वाहतूक बंद होते. दोन वर्षे झाली तरी प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलेले नाही.
तातडीने हा गाळ काढून पाण्याला वाट निर्माण करावी व रस्त्यावरुन वाहणारे पाणी बंद करावे, अशी मागणी आहे. तालुक्याच्या पूर्व- पश्चिम भागाला जोडणारा अडकूर- इब्राहीमपूर हा मार्ग नेहमी वर्दळीचा आहे. अडकूर हे बाजारपेठेचे गाव असल्याने परिसरातील कानडी, सत्तेवाडी, शिरोली, अलबादेवी, उत्साळी गावातील नागरीक या मार्गाने प्रवास करतात.
कानूर, इब्राहीमपूर, गवसे परीसरातील नागरीकांना गडहिंग्लज, कोल्हापूरला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा पडतो. त्यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते. परंतु पावसाळ्यात शिरोली नजीकच्या ओढ्याला पाणी आल्यास रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना अडचण होते. रस्त्याला समांतर असलेल्या या मोरीच्या नळामध्ये गाळ साचला असून ओढ्याचे पात्रसुध्दा गाळाने भरले आहे. गाळ काढल्याशिवाय नळातून पाणी जाणे अशक्य आहे.
संपादन - सचिन चराटी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.