बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा केंद्राकडे मदत मागावी ! मुख्यमंत्र्यांचा फडणवीस यांना टोला 

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

सोलापूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यापेक्षा राज्यातील पूरग्रस्तांना मदत मिळावी या हेतूने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करावी, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापुरातील पत्रकार परिषदेत लगावला. 

मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर तर पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, पुण्यातील काही भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या बळिराजाच्या डोळ्यात पाणी आले असून अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांनी काय मागण्यापेक्षा, त्यांना काय देता येईल याकडे सरकारचे लक्ष आहे. विरोधकांनी यामध्ये राजकारण न आणता पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी केंद्राकडून काय मदत मिळवता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता सर्वांनी एकत्रित येऊन मदतीची मागणी करावी, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली. 

विरोधक हे परराज्यातील नाहीत 
महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही केंद्र सरकारकडे मदतीची अपेक्षा केली आहे. केंद्र सरकारने ही मदत देण्याची ग्वाही दिली असून विरोधकांनी राज्य सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा केंद्राकडून ही मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विरोधक हे आपल्याच राज्यातील असून परराज्यातील वा परदेशातील नाहीत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत लगावला. 

संपादन: श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com