विकासकामे करा नाही तर बक्षिस वापस घ्या

water.jpg
water.jpg

माढा(सोलापूर)ः वॉटर कप स्पर्धेतील बक्षिसाच्या रकमेतून गावात कामे न झाल्याने वडाचीवाडी (अंजनगाव उमाटे) येथील काही ग्रामस्थांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत माढा तालुक्‍यातील प्रथम क्रमांकाचे मिळालेले बक्षीस परत करण्याबाबत माढा तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे. 

वडाचीवाडी गावाने 2019 च्या वॉटर कप स्पर्धेत माढा तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यामुळे गावाला 10 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. या बक्षिसातून अद्याप गावात कामे झाली नाहीत. गावात वेळोवेळी झालेल्या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी कामे करू, असे सांगायचे पण अद्यापपर्यंत काम झाले नाही. त्यामुळे मिळालेले प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह तहसील कार्यालयाकडे जमा करत असल्याचे म्हटले आहे. या वेळी नायब तहसीलदार आर. बी. पतंगे यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. 

वडाचीवाडी गावात मोठ्या प्रमाणावर पाणी फाउंडेशनची कामे झाली आहेत. गावाने उभा केलेली कामे कौतुकास्पद आहेत. मात्र, पुरस्कार परत करण्याची वेळ यायलाच नको आहे. पाणी फाउंडेशनच्या कामात दाखवलेला एकोपा आता कसोटीच्या काळातही दाखवण्याची गरज असून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्रामविकास अधिकारी, पाणी फाउंडेशनचे काम करणारे लोक या सर्वांनी सामंजस्याने हा प्रश्‍न सोडविण्याची गरज आहे. 

 
ठराव घेतल्यावर पुढील कार्यवाही 
बक्षिसाच्या रकमेतून कामे करण्यासाठी ग्रामसभा घेऊन कामे सुचवावी लागतात व ठराव घ्यावा लागतो. सध्या ग्रामसभेला स्थगिती आहे. मासिक सभेतही कामाबाबत ठराव झाले नाहीत. त्यामुळे कामे करण्याबाबतच्या तांत्रिक गोष्टी करता आल्या नाहीत. ठराव घेतल्यानंतर कामाबाबत पुढील कार्यवाही 
- समाधान यादव, ग्रामविकास अधिकारी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com