जितेंद्र आव्हाड सोलापूरचे पालकमंत्री 

जितेंद्र आव्हाड सोलापूरचे पालकमंत्री 

सोलापूर ः सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जितेंद्र आव्हाड यांची आज नियुक्ती केली आहे. यापूर्वी दिलीप वळसे-पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री होते. वळसे-पाटील यांच्याऐवजी आव्हाड यांच्याकडे पालकमंत्रीपद का देण्यात आले याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. वळसे-पाटील यांची 83 दिवसांमध्येच उचलबांगडी करण्यात आली आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये विजयकुमार देशमुख यांना सोलापूरचे पालकमंत्री केले होते. श्री. देशमुख यांनी पाच वर्ष पालकमंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ 83 दिवसांमध्येच सोलापूरचे पालकमंत्री बदलले आहेत. याचे नेमके कारण काय? हा अनेकजणांना पडलेला प्रश्‍न आहे. 

वळसे-पाटील हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याकडे पालकमंत्री पदाचा पदभार आल्यापासून जिल्ह्यात काम करणारे अधिकारी सतर्क झाले होते. मुद्देनिहाय उत्तरे देण्यापलीकडे इतर बाबींविषयी श्री. वळसे-पाटील यांच्याकडे थारा नव्हता. अनेक अधिकारीही जिल्हा नियोजन समिती असो किंवा वळसे-पाटील यांनी घेतलेल्या बैठका असो त्याची तयारी योग्य पद्धतीने करूनच ते बैठकीला उपस्थित राहात होते. मात्र, देशासह राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री म्हणून वळसे-पाटील हे एक दिवसही सोलापूरला आले नाहीत. व्हीसीद्वारे त्यांनी दोन-तीन वेळा जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्याचवेळी त्यांनी प्रशासनाला काही सूचनाही दिल्या होत्या. पण, प्रत्यक्षात जिल्ह्यात उपस्थित राहून कोरोनाविषयी प्रशासनाला सूचना देणे वळसे-पाटील यांना शक्‍य झाले नव्हते. कदाचित त्यामुळे त्यांच्याकडील पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले असावे का? याबाबतही तर्क-वितर्क लढविले जात आहेत. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com