Kolhapur Floods : एक लाख नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

kolhapur
kolhapur

कोल्हापूर  :  एकूण 227 गावांमधून 22 हजार 285 कुटुंबातील 1 लाख 6 हजार 946 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. याकामी 56 बोटी आणि 425 कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

तालुकानिहाय कुटुंब आणि सदस्य संख्या पुढीलप्रमाणे- कागल- 25 गावातील 1 हजार 73 कुटुंबातील 5 हजार 542 सदस्य, राधानगरी– 12 गावातील 558 कुटुंबातील 3 हजार 40 सदस्य, गडहिंग्लज– 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा– 19 गावातील 81 कुटुंबातील 313 सदस्य, भुदरगड – 14 गावातील 257 कुटुंबातील 1 हजार 31 सदस्य, शाहुवाडी – 6 गावातील 123 कुटुंबातील 489 सदस्य, पन्हाळा – 28 गावातील 405 कुटुंबातील 1 हजार 833 सदस्य, शिरोळ – 43 गावातील 7 हजार 857 कुटुंबातील 42 हजार 757 सदस्य, हातकणंगले – 21 गावातील 4 हजार 401 कुटुंबातील 20 हजार 790 सदस्य, करवीर – 25 गावातील 3 हजार 879 कुटुंबातील 16 हजार 43 सदस्य, गगनबावडा– 2 गावातील 50 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 11 गावातील 96 कुटुंबातील 516 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 2 हजार 569 कुटुंबातील 10 हजार 348 जणांचे स्थलांतर करण्यात आले.

यासाठी करवीर तालुक्यात 18 बोटी व 224 कर्मचारी, शिरोळ तालुक्यात 16 बोटी व 73 कर्मचारी, हातकणंगले तालुक्यासाठी 4 बोटी व 26 कर्मचारी, महापालिका क्षेत्रात 10 बोटी व 62 कर्मचारी, गडहिंग्लजसाठी 2 बोटी व 10 कर्मचारी तसेच आजरा व चंदगड तालुका वगळता उर्वरित तालुक्यांसाठी प्रत्येकी एक बोट व 5 कर्मचारी नेमण्यात आले आहेत यामध्ये लष्कर, नौदल, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com