30 जण वाराणसीहून आले अन...

30 persons came from Varanasi send to institution's quarantine
30 persons came from Varanasi send to institution's quarantine

मिरज : उत्तर प्रदेशातील वाराणसीहून आलेल्या तीस जणांची आज येथील संस्था विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या तपासण्या सुरू होत्या. या सर्वांना मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील खानापूर, मिरज, आटपाडी, तासगाव या परिसरातील हे लोक आहेत. यात चोवीस पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. सांगोला तालुक्‍यातील आठ जण त्यांच्यासोबत प्रवास करीत होते. त्या आठ जणांना सांगोला येथे त्याच गाडीतून उतरवण्यात आल्याचे प्रवाशांनी पोलिसांना सांगितले. 

अधिक माहिती अशी ः या सर्वांना घेऊन ही खासगी प्रवासी बस सोमवारी (ता. 13 एप्रिल) वाराणसीहून निघाली. ती आज (बुधवारी) सकाळी भोसे येथील तपासणी नाक्‍यावर अडवण्यात आली. तेथे सर्वांची तपासणी केल्यानंतर जिल्हा प्रशासनास माहिती देण्यात आली. जिल्हा प्रशासनाने सर्वांची पुन्हा तपासणी करून त्यांची संस्था विलगीकरण कक्षात रवानगी करण्याचा निर्णय घेतला. त्यास अनुसरून सर्व तीस जणांना घेऊन बस शासकीय तंत्रनिकेतन येथे आली. प्रवाशांनी बसमधून खाली उतरण्यास नकार दिला. पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल यांनी सहकाऱ्यांसह शासकीय तंत्रनिकेतन येथे येऊन सर्व तीस जणांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने श्री. गिल यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. हा इशारा व गिल यांचा आवेश पाहून प्रवाशांनी खाली उतरण्यास सुरवात केली. त्यांना शासकीय तंत्रनिकेतनमधील संस्था विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले. तेथेही या प्रवाशांनी नाराजी व्यक्त करीत प्रवेश केला. तेथे पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. सर्वांचे स्वॅब घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

31 अहवाल निगेटिव्ह 
दोन दिवसांपासून प्रलंबित असणारे 31 अहवाल आज प्राप्त झाले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. त्यात तबलीग ए जमात व रेठरे धरण येथील रुग्णाशी संपर्क आलेल्या संबंधित व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, यापूर्वी इस्लामपूर येथील कोरोनाग्रस्त महिला सध्या आयसोलेशनमध्ये दाखल आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

बस टुरिस्ट कंपनीची 
संबंधित बस टुरिस्ट कंपनीची आहे. ती उत्तर प्रदेशातील आहे. सांगलीत येण्यासाठी त्यांच्याकडे विशेष परवाना असल्याची चर्चा होती. त्या आधारेच ते सर्वजण वाराणसीतून प्रवास करीत सांगलीत आल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबत पोलिस माहिती घेत आहेत. 

कोल्हापूरहून दोघे सांगलीत 
कोल्हापूरहून चालत निघालेले दोघे सांगलीतील बस स्थानक परिसरात मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते वाराणसीला निघाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना महापालिकेच्या निवारा केंद्रातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यांची तपासणी केली जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com