आठ कारखान्यांची साखर होणार जप्त

आठ कारखान्यांची साखर होणार जप्त

कोल्हापूर - १४ दिवसांत एकरकमी ‘एफआरपी न देणाऱ्या जिल्ह्यातील आठ कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी तहसीलदारांना दिले.

दत्त (शिरोळ), संताजी घोरपडे (बेलेवाडी), वारणा (वारणा), पंचगंगा (इचलकरंजी), गुरूदत्त शुगर्स (टाकळवाडी), इकोकेन (म्हाळुंगे), जवाहर (हुपरी) वर शरद (नरंदे) या कारखान्यांवर कारवाई केली जाणार आहे. 

कारखान्यांवर कारवाई होऊ नये यासाठी कारखानदारांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. तर, आदेश देऊनही कारखान्यांवर जप्तीची कारवाई का होत नाही, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाला धारेवर धरले. आठ दिवसात शेतकऱ्यांना एफआरपीचे एक रक्कमी आणि व्याजासह पैसे मिळाले पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका संघटनेने घेतली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनानेही आज जप्ती आदेश दिलेल्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

एकरकमी एफआरपी मिळणार का?
जिल्हा प्रशासन साखर जप्त करू शकत नाही. कारखान्यांची साखर बॅंकांना तारण ठेवली आहे. तारणावर असलेली साखर कायद्यानुसार जप्त करता येत नाही. तसेच, जप्त केली तरीही शेतकऱ्यांना एफआरपीनुसार एकरकमी एफआरफी दर मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com