ग्रामरोजगार सेवकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

ग्रामरोजगार सेवकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

मंगळवेढा : दुष्काळ जाहीर होऊनही दुष्काळग्रस्तांसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत, या परिस्थितीत शेतकरी त्रस्त आहेत. सध्या निवडणुकीच्या तोंडावर विविध संघटना आंदोलन करत असताना यामध्ये आता रोहयो कामावरील  ग्रामरोजगार सेवक सहभाग घेतला असून त्यांनीही 2 जानेवारी पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत ऐन दुष्काळात या योजनेचे काम बंद म्हणजे दुष्काळात धोंडा महिना अशी अवस्था झाली. 

ग्रामीण भागातील नोंदणीकृत मजुरांना राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कायद्यानुसार किमान 100 दिवस काम देण्याची तरतुद करण्यात आली. या योजनेवरील कामाची मजुरी आधारने जोडलेल्या बॅक खात्यावर जावू लागल्याने गैरव्यवहार करण्यास संधी मिळेना म्हणून या योजनेत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. सत्ता बदल्यानंतर राज्यात 11 कलमी योजना सुरू केली. यातील विहीर, शेततळी, फळबाग, गांडुळ खत खड्डे, कंपोष्ट खत खड्डा, शौचालय, घरकुल, जनावराचा गोठा, रस्ते, खेळाचे मैदान आदी कामे त्यामध्ये सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची घेता येतात यातून दुष्काळाशी सामना करता येतो. परंतु इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात या योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे रोजगार सेवकवर्गासहीत शेतकऱ्यांच्या जीवनात अंधार निर्माण झाला. या योजनेच्या कायद्यानुसार या कामावरील मजुरांची हजेरी घेण्यासाठी राज्यात 27 हजार ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती 26 जानेवारी 2008 च्या ग्रामसभेत केली. मजुरांनी केलेल्या कामाच्या मजुरीवर टक्केवारीनुसार मानधन निश्चित करण्यात आले. पण ते ही वेळेवर नाही. पण दहा वर्षात कुठेही समायोजन नाही. ना नोंद, ना दखल, शासन अन्य कंत्राटी पदे समायोजन करत आहे.  पण रोजगारसेवकाकडे मात्र दुर्लक्ष आहे. म्हणून नवीन वर्षामध्ये इतर राज्याप्रमाणे मासिक वेतन देण्यात यावे. रोजगारसेवकाचे मानधन दरमहा थेट खात्यावर जमा करण्यात यावे. शासकीय सेवेत घ्यावे. इतर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. 
 
''दहा वर्षात गावातून तालुक्याला जाण्या-येण्याचा प्रवास खर्च आणि मिळणारे अवेळी मानधन याच्या तुलनेत मजुरांच्या प्रतीदिन मजुरी इतकेही नाही. सध्या कंत्राटी पदाचा शासन विचार करत आहे. पण दहा वर्ष तुटपुंजा मानधनावर पुर्ण वेळ कर्मचाऱ्यां इतके काम करून ही अजून किती दिवस वाय्रावर शासन सोडणार म्हणून  2 जानेवारी पासून जिल्ह्यात कामबंद आंदोलन सुरू करणार.''
- दत्तात्रय सुतार, जिल्हाध्यक्ष रोजगारसेवक संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com