काजूच्या भरपाईसाठी चंदगडला उपोषण

काजूच्या भरपाईसाठी चंदगडला उपोषण

चंदगड - या वर्षी काजू पिकाच्या उत्पादनात ८० ते ९० टक्के घट झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने भरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी येथे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदणकर, अनंत पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तहसीलदारांना मागणीचे निवेदन देण्यात आले. 

तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन झाले. आंदोलकांसमोर बोलताना हळदणकर म्हणाले, ‘‘तालुक्‍यातील शेतकऱ्यांना या वर्षी निसर्गाने मोठा फटका दिला आहे. अतिवृष्टीमुळे ऊस पिकाच्या वजनात घट झाली. शिवाय आर्थिक हात  देणाऱ्या काजू उत्पादनातही मोठी घट झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.’’ 

तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. सभापती बबन देसाई, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर, अरुण पिळणकर, कृष्णा रेगडे, आनंद शिंदे, जय शिवराय किसान मोर्चाचे शिवाजी माने, संग्रामसिंह अडकूरकर, शिवाजी शिंदे, राजेश पाटील, रामदास वड्ड, नितीन खाडे, भैरु मगदूम आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, मागणीचे निवेदन तहसीलदार विनोद रणावरे यांना दिले.

शासन कोकणातील शेतकऱ्यांना आंब्यासाठी तसेच विदर्भातील शेतकऱ्यांना कापसासाठी भरपाई देते. त्याच पद्धतीने चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागातील शेतकऱ्यांना काजूची नुकसानभरपाई द्यावी.
- बाबूराव हळदणकर,
माजी जि. प. सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com