उजनी कालव्याची बहुतांश कामे पूर्ण होऊनही मंगळवेढ्यातील शेतकरी पाण्यापसून वंचित

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा - तालुक्यातील बोराळे, नंदूर या उजनी कालव्याच्या शेवटच्या टोकाच्या परिसरात उजनी कालव्याची बहुतांश कामे पूर्ण होऊनही त्या परिसरातील शेतकऱ्यांना अद्यापही पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. येत्या हंगामात टेल टू हेड या नियमाप्रमाणे त्या परिसरातील शेतकऱ्यांना उजनी कालव्याचे पाणी मिळावे अन्यथा आंदोलनाचा इशारा जि.प. सदस्या शैला गोडसे यांनी दिला आहे.

यासंबंधी निवेदन देताना जि.प. सदस्या शैला गोडसे, गणेश गावकरे, श्रीशैल कुंभार, रामलिंग नकाते, बाळाजी मळगे, विश्वनाथ मळगे, अक्षय पवार आदी उपस्थित होते.

नंदूर परिसरात कालवा आहे गावाला पाणी नाही शेतीला असे वृत्त सकाळने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताचा या भागातील लोकप्रतिनिधी नसताना दखल घेत उजनी उजव्या कालव्याचा शेवट तालुक्यातील बोराळे, नंदूर भागामध्ये होतो. या उजव्या कालव्यावर बोराळे, अरळी, तांडोरे, तामदर्डी, रहाटेवाडी, डोणज आदी भागातील कालव्याची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. कालवा पूर्ण झाल्यानंतर शेतीला पाणी मिळेल, या आशेवर या परिसरातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून असून पाणी मिळण्याबाबतची लेखी मागणीही अनेकदा मंगळवेढा, सोलापूर येथील पाटबंधारे कार्यालयाकडे केली आहे. मात्र तरीही पाटबंधारे विभाग शेतकय्रांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने फारसा शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिला. 

पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या प्रकटनाद्वारे कालव्याच्या १३२ कि.मी. पर्यंतच्या लाभक्षेत्रातील शेतीला पाणी देण्याचे जाहीर केल्याप्रमाणे बोराळे, नंदूर परिसरातील शेकडो शेतकरी मंगळवेढा येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पाणी अर्ज भरण्यासाठी गेले होते. मात्र त्या ठिकाणी एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने पाणी मागणीचे अर्ज कोणाकडे करायचे? असा संतप्त सवाल शेतकरी करीत असून मागणी अर्ज करताना पाटबंधारे विभागाच्या नियमाप्रमाणे जी असेल ती पाणीपट्टी भरण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र हक्काचे पाणी न मिळाल्याने दरवर्षी होणारे नुकसान थांबले पाहिजे, अशी शेतकºयांची मागणी आहे.  गांभीर्याने न पाहणाय्रा पाटबंधारे विभागाने असा प्रकार यापुढे असाच सुरू राहिल्यास लोकशाही पद्धतीने शेतकरी मोर्चे, उपोषणाद्वारे पाण्याचा लढा उभारतील, असा इशारा शैला गोडसे यांनी दिला आहे. 

कार्यकारी अभियंता जोशी यांना बोराळे, नंदूर परिसरातील पूर्ण झालेली उजनी उजवा कालव्याच्या कामांची पाहणी करण्याची सूचना दिली आहे. नोव्हेंबरपासून उजनीच्या पाण्याचे रोटेशन सुरू होत आहे. जर सर्व कामे योग्य पद्धतीने झाली असतील तर त्या परिसरातील शेतकºयांना यावर्षीपासून त्यांच्या हक्काचे पाणी निश्चित दिले जाईल.
- धीरज साळे, अधिक्षक अभियंता, उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com