लढा दुष्काळाशी : 'पाणी नाही, चारा नाही तर जनावरं जगवायची कशी?' (व्हिडीओ)

Animal Cant Survive Without Fodder And Water At Atpadi Sangli
Animal Cant Survive Without Fodder And Water At Atpadi Sangli

आटपाडी (सांगली) : घरात माणसांनाच खायला, प्यायला अन्न आणि पाण्याची कमतरता आहे, तर जनावरांना काय खायला घालणार? या प्रश्नाने ग्रासून या गावातील अनेक शेतकरी आपली जनावरे विकायला काढतात. आटपाडी आठवडे बाजार भरवून आपल्या जनावरांना नाईलाजास्तव विकावं लागतं. 

पाणी नाही, चारा नाही तर जनावरं कशी जगवायची? त्यापेक्षा विकून टाकलेली बरी! या विचारातूनच भरणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या आठवडा बाजारातील चित्र 'सकाळ'च्या टीमने 'लढा दुष्काळाशी' या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुढे आणले.

या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे सोलापूर, सांगली, कोकण येथून आपल्या शेळ्या, मेंढ्या विकायला शेतकरी येथे येतात. या शेळ्या, मेंढ्यांचं मटण प्रसिध्द आहे. कारण ही जनावरं डोंगररानातील पालापाचोळा, चारा खातात. त्यामुळे येथील जनावरांना बिर्याणीसाठी मोठी मागणी आहे. येथील काही व्यापाऱ्याशी संवाद साधला असला ते म्हणाले, 'स्वतः शेतकऱ्यालाच प्यायला पाणी नाही, शेतकरी हवालदील झाला आहे. नाईलाजाने शेतकऱ्याला या बाजारात यावं लागतं. शेतकरी पदरात पडेल तितक्या पैशात जनावरं विकतात. पण यामुळे धनगर संपण्याच्या वाटेवर आहेत. शेतकरीच संपला तर आमचाही धंदा पुढं चालणार कसा? म्हणून शेतकऱ्याची जनावरं जगली पाहिजे आणि आमचाही धंदा चालला पाहिजे यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजे.'

येथील शेळ्यांचे मालक शेतकरी म्हणाले, 'ज्या शेळीचा भाव नऊ ते दहा हजार आहे त्या मेंढ्या दोन ते चार हजारात मागतात. पण करणार काय? पाणी, चारा नसल्यानं विकाव्या लागतात.' 


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com