निवडणूक आली; म्हणून मोदींनी गाजर दाखवलंय : अण्णा हजारे

Anna Hazare
Anna Hazare

राळेगणसिद्धी : केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प म्हणजे इलेक्शन स्टंट आहे. हे सरकार म्हणजे घोषणाबाज व फसवे सरकार आहे, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

अण्णा म्हणाले, की निवडणूका आल्या की घोषणा खूप होतात. निवडणूक काळात आश्वासनांची गाजरे दाखवली जातात. मात्र अंमलबजावणी होत नाही. या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा यापूर्वीही निवडणुकीत केल्या होत्या. या बजेटमध्ये स्वामिनाथन आयोगाचा उल्लेख नाही. या पूर्वी आम्ही सत्तेत आलो तर कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात येईल असे जाहीर केले. मात्र, शेतीमालाला बाजारभाव नाही. शेती माल रस्त्यावर फेकत आहेत. शेती मलाला दीडपट हमीभाव देऊ असे जाहीर केले मात्र अद्याप दिला नाही. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार पेन्शन ही थट्टा आहे. कर्जमाफी फसवी ठरली तसेच कृषी मूल्य आयोगाला स्वायत्त दर्जा देऊ असे सांगितले मात्र बजेटमध्ये उल्लेख नाही. कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी ठिबक व तुषारवरील जीएसटी कमी करण्याचे अश्वासनही हवेत विरले आहे. 

इलेक्शन जवळ आले, की गाजर दाखवतात. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही अशी टीकाही हजारे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com