शेट्टींनी कुबड्या सोडून लढावे

शेट्टींनी कुबड्या सोडून लढावे

इस्लामपूर - खासदार राजू शेट्टी हे निवडणुकीच्या काळात अनेकांच्या कुबड्या घेतात. त्यातील एक चोर, ते दुसरा दरोडेखोर आहे. त्यांनी स्वत:च्या बळावर लढावे, असे आवाहन प्रहारचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अतुल खुपसे-पाटील यांनी येथे पत्रकार बैठकीत केले.

श्री. खुपसे-पाटील म्हणाले,‘‘जिल्ह्यातील शिवाजी केनने अनेक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडवलेत. खासदार राजू शेट्टींनी दिल्लीपर्यंत अनेक संघटना गोळा केल्या.  पण मतदारसंघातील ५ हजार शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेतकरी चळवळ उभी केली. त्या चळवळींवर लोकांचा विश्वास होता. आता काही चळवळी वर्गणी गोळा करू लागल्या आहेत. लोकांचा त्या चळवळींवर विश्वास राहिलेला नाही.’’

ते म्हणाले,‘‘आमदार बच्चू कडू-पाटील यांनी शेतकरी व सामान्यांना न्याय दिला. प्रहार संघटना सुखा समवेत नसून दु:खासमवेत आहे. प्रहार संघटनेच्या माध्यमातून लाखोंची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. इटकरे येथे संघटनेकडून रुग्ण कक्ष सुरू केला आहे. गरजूंनी लाभ घ्यावा.’’ स्वप्नील पाटील, संपत कांबळे, रामचंद्र देशमुख, सचिन पाटील, प्रकाश सुतार, संदीप सासणे, विकी मोरे, राणा वाघमोरे, दिग्विजय पाटील उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com