साहित्य महामंडळ भाजप-संघाच्या दावणीला : डॉ. बाबुराव गुरव

baburaogurav
baburaogurav

सांगली : मराठी संमेलनाचे उद्‌घाटक नयनतारा सहगल यांचे नियोजित भाषण अभिजनांना रुचणारे नसल्यानेच त्यांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्यात आले. त्यातून साहित्य महामंडळ भाजप-संघ प्रवृत्तीच्या दावणीला बांधल्याचे सिध्द होते असा आरोप विद्रोही साहित्य चळवळीचे प्रा.बाबुराव गुरव यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यावेळी ऍड. के. डी. शिंदे, प्रा. नामदेव करगणे, विकास मगदूम, प्रा. विजय कोगनोळे, सदाशिव मगदूम आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले,"सहगल यांचे भाषण विचारस्वातंत्र्याचे झळाळते दर्शन आहे. मात्र संमेलन संयोजक महामंडळाने त्यांना अपमानास्पद वागणूक दिली आहे. महामंडळातील मंडळी नेहमीप्रमाणे सत्तेच्या बाजूने गोंडा घोळून श्रीखंड-पुरीचे जेवण म्हणजे संमेलन अशी पुर्वपरंपरा पुढेही सुरू ठेवत आहेत. या महामंडळात लाचारांची फौजेची भरती आहे. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. जोशी स्वतःला पुरोगामी विचारवंत म्हणतात मात्र त्यांनी तो स्वाभिमान दाखवला नाही. आता वेळ न दवडता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य महामंडळ, संयोजन समितीने सहगल यांना सन्मानाने बोलवावे. सहगल यांचे भाषण संमेलनात वाचले गेलेच पाहिजे. त्यांच्या विचाराचा सन्मान झालाच पाहिजे. सहगल यांना नाकारणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला आहे. त्याचा विद्रोही साहित्य संस्कृती चळवळीतर्फे निषेध आहे.'' 

"त्या' भाषणाचे रविवारी वाचन - 
प्रा.गुरव म्हणाले,"" अजूनही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्री, महामंडळ आणि संयोजन समितीने सहगल यांना सन्मानाने निमंत्रित करून संमेलनाचे निघत असलेले धिंडवडे थांबवावेत. निमंत्रण रद्द केले तरी सहगल यांचे भाषण-विचार समाजमाध्यमांतून व्हायरल होत आहेत. त्यांच्या भाषणाचे जाहीर वाचन राज्यात सर्वत्र होत आहे. सांगलीतही रविवारी (ता.13) दुपारी 3 वाजता कष्टकऱ्यांची दौलत येथेही ते होईल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com