बेळगाव : गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या काळात विशेष करून अग्निशमन दलाला बचाव कार्य राबवावे लागत आहे. यंदा देखील पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला पोलीसखाते आणि अग्निशमन दलाच्यावतीने संयुक्तरित्या योग्यरीत्या हाताळावे लागेल. असे सूचना पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिली.
यंदादेखील पूर परिस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यास अग्निशमन दल सज्ज आहे का याची मंगळवार अग्निशमन दल कार्यालयाला भेट देऊन पोलीस आयुक्तानी पाहणी करत अधिकार्याकडून माहिती जाणून घेतली. गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी होत असल्याने शहर ग्रामीण भाग आणि जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होत आहे. यामध्ये अनेकांना जीव गमवावे लागत असून मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
गतवर्षी तर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग तब्बल आठ दिवस ठप्प झाला होता. त्यामुळे या काळात अग्निशमन दलाच्यावतीने खडतर प्रयत्न करून महामार्गावर अडकून पडलेल्यांची सुटका करण्यात आली. त्याच बरोबर नदी नाल्यातून वाहून गेलेल्याना देखील शोधण्यात आले. त्यामुळे यंदा देखील संभाव्य धोका ओळखून अग्निशमन दलाकडे योग्य सामग्री आहे का याची त्यांनी पाहणी केली. सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध असल्यामुळे तसेच मनुष्यबळ देखील पूर्णपणे असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. एखाद्यावेळी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना संपर्क साधून संयुक्तरीत्या कार्य केले पाहिजे. अशी सूचना त्यांनी केली. यावेळी अग्निशमनदलाचे जिल्हा ठाणाअधिकारी शशिधर निलगार बेळगाव अग्निशमन ठाणाधिकारी व्ही. एस. टक्केकर आदी उपस्थित होते
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.