काँग्रेस, राष्ट्रवादीच्या किल्ल्यात भाजपचा शड्डू 

Satara
Satara

कऱ्हाड ; राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या कऱ्हाड दक्षिणसह सातारा जिल्हा विधानसभा निवडणुकीत भाजपने टार्गेट केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रेठरे बुद्रूक येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा दुष्काळमुक्त करण्याची घोषणा करत भाजपने अनेक अंगाने त्यात गोळा बेरीज सुरू केल्याचेही अधिक ठळक झाले.

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना घरी बसविण्याची भाषा करत अतुल भोसले यांनी शड्डू ठोकला. कार्यक्रमाचे कालचे वातावरण कायम ठेवण्यात भोसले गटासह भाजप कितपत यशस्वी होणार त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. कऱ्हाड दक्षिणेत चव्हाण यांची अडचण करण्याचे नियोजन असले तरी माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाची काय भुमिका आहे. त्यावरही बरच काही आहे. उंडाळकर यांनीही निवडणुक लढवण्याचा शड्डू ठोकला आहे. त्यांना शिवसेनेतून ऑफर आल्याची चर्चा आहे. त्यामुळे लढत तिरंगीच होईल, असे वातावरण आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कालच्या दौऱ्याला अऩेक कंगोरे आहेत. अनेकांचा संपर्क असल्याचे जाहीर करतानाच पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादीला धक्का देणारी तंत्रे  भाजप अवलंबत आहे, असेही कालच्या कार्यक्रमातून अधोरेखीत झाले. किल्ले मच्छींद्र गडावर उभारलेल्या हेली पॅडवर सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेटही काल गाजली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा अतुल भोसले यांनी कार्यक्रम घेतला. भोसले गटाच्या कार्यक्रमात कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील यांनी  मुख्यमंत्र्यांचा विशेष सत्कार केला. त्यांची व्यासपीठावरील उपस्थीती व आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी घेतलेली भेट दोन्ही घटनांनी राष्टर्वादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची पकड घट्ट होत आहे, ते तर अधोरेखीत झालेच. त्याशिवाय काँग्रेसला अडचणीत आणणारीही खेळी करण्यात आली. माथाडी नेते पोपट पाटील  यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते पृथ्वीराज चव्हाण यांचे निकट वर्तीय आहेत. त्यांचा प्रवेशही काँग्रेसला दक्षिणेत धक्क  देणारा आहे. त्यांची स्नुषा नुकतीच काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून मलकापूरात निवडुण आल्या आहेत. त्यामुळे त्याचीही जोरदार चर्चा होती. 

राष्ट्रवादीला टार्गेट करताना भाजपने दक्षिणेतून अतुल भोसले यांची उमेदवारी निश्चीत केल्याचा संदेशही दिला. त्यांच्या कामाचे कौतुक मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेच. त्याही पलिकडे भोसले यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवा, असे जाहीर आवाहन केले. ते करताना पृथ्वीराज चव्हाण व भोसले यांच्या कामाची तुलना केली. अतुल भोसले यांच्या कामाबाबतच्या त्यांच्या आग्रही भुमिका सविस्तर मांडल्या. भोसले यांनीही कार्यक्रमातून शक्ती प्रदर्शन केले. त्यात त्यांनी शड्डू ठोकला आहेच. कार्यक्रमाचा कालचा टेम्पो कायम ठेवण्याचे आव्हान अतुल भोसले यांच्यापुढे आहे. त्यात माझी आमदार विलाॊराव पाटील- उंडाळकर यांच्या गटानेही निवडणुका लढवणार आहे. असे जाहीर केले आहे. त्यांना शिवसेनेची आॅफर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तेही रणांगणात असणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनीही तयारी केली आहे. मात्र गटनिहाय व गावनिहाय दुरावणारा कार्यकर्ता, भाजपचा वाढते वातावरण याचे आव्हान पेलत चव्हाण विकासाची गती ठेवण्यात कितपत यशस्वी होणार यावर बरच काही अवलंबून आहे. तुर्त तरी कऱ्हाड दक्षिणेत तिरंगू लढत होणार हेही कालच्या वातावरणातून ठळकपणे पुढे आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com