अमित शहा यांना रोखणे म्हणजे ‘आग रामेश्‍वरी...’

अमित शहा यांना रोखणे म्हणजे ‘आग रामेश्‍वरी...’

शिरोळ - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सरकारमध्ये मंत्री नाहीत अथवा महाराष्ट्रातील ते साखर कारखानदारही नाहीत. असे असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी अमित शहांना कोल्हापूर दौऱ्यावर रोखू, अशी घोषणा केली आहे. त्यांना रोखणे म्हणजे आग रामेश्‍वरी आणि बंब सोमेश्‍वरी, असा प्रकार आहे. विनाकारण अडवणूक करून चुकीची प्रथा आणि पायंडा खासदार शेट्टी यांनी पाडू नये, असे प्रतिपादन ‘गोकुळ’चे संचालक व शिरोळ तालुक्‍याचे भाजपचे नेते अनिल यादव यांनी केले आहे.

यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘‘ऊस दरासंदर्भात यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत असताना संघटनेच्या प्रतिनिधींनी शासन प्रतिनिधीची गरज नाही, असे सांगून कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपीचा निर्णय घेतला. भाजप सरकारने चार वर्षांमध्ये एफआरपीची रक्‍कम टप्प्याटप्प्याने वाढविली आहे. खासदार शेट्टी मोदी यांच्यासमवेत होते. मोदी यांचे तत्त्व पटले नाही म्हणून अचानक भूमिका बदलणाऱ्या खासदार शेट्टी यांनी अमित शहांबाबत कोल्हापूर जिल्ह्यात रोखू अशी घोषणा करणे म्हणजे आग रामेश्‍वरी आणि बंब सोमेश्‍वरी असा प्रकार आहे. 

लहान शेतकरी अडचणीत - डांगे

बड्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तसेच ज्यांचा वशिला आहे, अशा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप झाले आहे. अल्पभूधारक, लहान ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक आहे. या पार्श्‍वभूमीवर संघटनेची नेतेमंडळी ऊस तोड बंद आंदोलन करीत आहेत. ही दुर्दैवाची बाब आहे. असे शिरोळ तालुका भाजपचे प्रवक्‍ते, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे 
यांनी सांंगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com