Budget 2019 : अर्थसंकल्पाने नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ - जयंत पाटील

Budget 2019 : अर्थसंकल्पाने नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ - जयंत पाटील

सांगली - देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प गोंधळलेला वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यायचे आहे याची स्पष्टता त्यात नाही. अर्थसंकल्पाने नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ बसेल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.  

श्री. पाटील म्हणाले,  खरं तर आधीच असलेल्या शेतीशी संबंधित योजनांना भरीव निधी देणे या अर्थसंकल्पातून अपेक्षित होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या महागाईबद्दल महिलांच्या वेदना समजून घेऊन त्या कमी करण्यासाठी काहीतरी करतील असे वाटत होते. मात्र महागाई कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. युवा वर्गालाही नाराज करणारा हा अर्थसंकल्प आहे. देशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडत आहेत, त्यावरही कोणताच उपाय या अर्थसंकल्पात केलेला नाही.

श्री. पाटील म्हणाले, कालच्या आर्थिक पाहणीत देखील गोलमाल वाटत आहे. किमान अर्थसंकल्पात तरी देशाच्या विकासाच्या इंजिनाला भरीव गती देणारे निर्णय घेतले जातील असे अपेक्षित होते, मात्र तसे काहीही झालेले नाही. उलट या अर्थसंकल्पाने नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ बसेल.अर्थमंत्र्यांनी लोकानूनयी निर्णय घ्यायचे नसतात, उलट देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राहण्यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करायच्या असतात मात्र निर्मला सीतारामन यांना हे  माहितीच नाही असे दिसते. काळा पैसा भारतात परत आणण्याची वल्गना करणाऱ्या या सरकारने बजेटमध्ये या विषयाचा नामोल्लेख सुद्धा केलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com