करमाळा: करमाळा तालुक्यात सध्या दुष्काळाच्या झळा तीव्र जाणू लागले आहेत. सध्या अनेक गावात पाण्याची टंचाई जाणू लागले असून लोकांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे.
विहीर, बोअर यांची पाणीपातळी खालावली आहे. उजनी परीसर व दहीगांव उपसासिंचन योजना लाभधारक भागातील गावे वगळता तालुक्यात इतर ठिकाणी पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. यावर्षी सरासरीच्या फक्त 29 टक्के पाऊस झाला असून गेली दहा वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद या वर्षी तालुक्यात झाली आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच जणावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.
यावर्षी तालुक्यातील एकाही तलावात पाणी आले नाही. मोठी पाणी साठवण क्षमता असलेल्या वीट, राजुरी, नेर्ले, विहाळ ,कोर्टी तलावात कसलेच पाणी आले नाही. पांडे व फिसरे ग्रामपंचायतीने टॅकरसाठी प्रस्ताव दाखल केले आहे. इतर 25 गावांनी टॅकरची मागणी केली आहे माञ अद्यापही तहसीलदार कार्यालयात प्रस्ताव दाखल झाले नाहीत. बोरगांव प्रादेशिक पाणी पुरवठा बंद असल्याने पोथरे, बिटरगांवश्री ,बोरगांव, निलज व इतर भागातील लोंकाना पाणी मिळत नाही.
दुष्काळ पडलाय, सध्या गावात कुंठच पाणी नाही, नागेश कांबळे यांच्याकडुन फुकट पाणी घेतो त्यामुळे ते दिडशे रुपयाला गावात विकायला परवडते. 500 लिटरचे ट्रम 150 रूपयाला विकतो.काही काही लोक करमाळ्यातुन पिण्यासाठी पाणी आणतात.- दादा अंबादास खोत, रोशेवाडी, ता. करमाळा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.