चंद्रकात पाटलांनी केले शरद पवारांचे कौतुक 

Chandrakant Patil
Chandrakant Patil

पंढरपूर : विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने सर्वाधिक जागा देऊनही अद्याप राज्यात सरकार स्थापन होत नाही, याच दुःख महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करत राष्ट्रपती राजवटीचे संकेत दिले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच त्यांनी कौतुक केले आहे.

कार्तिक एकादशीच्या महापूजेसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज (गुरुवार) संध्याकाळी पंढरपुरात आले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीनंतर जनादेश दिला असतानाही राज्य सरकार स्थापन होत नाही याचं दुःख आहे. मात्र, भाजपच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांवर सुद्धा टीका केली जाते, याचे दुःख भाजपला आहे, असे म्हणत त्यांनी खासदार संजय राऊत आणि शिवसेनेला टोला लगावलेला आहे.

राज्यात महापूर आणि त्यानंतर आलेला पाऊस यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झालेले आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांची जाण असणारे एक चांगले नेते आहेत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या कामाचं कौतुक केले. महापूजेसाठी आलो असून, विठ्ठलाला साकडे घालणार आहे, की निसर्गाचे चक्र बदलले आहे. त्यामुळे संकटा मागून संकटे येत आहेत. यामधून बळीराजा आणि राज्यातील जनतेला सावरण्याची शक्ती दे. 

कोणत्याही पक्षाचे आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही. जे नेते आमच्यासोबत आले आहेत, ते फक्त विकासाची दूरदृष्टी ठेवून भाजपसोबत आले आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

उद्या शपथविधी होणार का, या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. यामुळे 9 नोव्हेंबरपर्यंत सरकार अस्तित्वात आल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? असे संकेत पाटील यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com