पुणे : ‘‘विधानसभा निवडणुकांत कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार बहुमताने सत्तेत येईल. तसेच येणाऱ्या काळात राजस्थानच्या निवडणूक आहे. तेथे तेखील पुन्हा काँग्रेसलाच सत्ता मिळेल,’’ असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला.
पुण्यात भारती विद्यापीठाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘ गरीब जनतेसाठी मोफत आरोग्य विमा, शिक्षणाची सेवा राजस्थान सरकारने पुरविली आहे. महागाई कमी करण्यात देखील सरकारला यश आले आहे.
काँग्रेसने राजस्थानमध्ये निर्माण केले आहे. तसेच पाच वर्षात विविध विकासकामे, कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, असे ते म्हणाले. सध्या देशासमोर महागाई आणि बेरोजगारी हे दोन ज्वलंत विषय आहेत, असे त्यांनी नमूद केले.
राजस्थानच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेहलोत यांच्या टीका केली. राजस्थान सरकारमधील आमदार आणि मुख्यमंत्री एकमेकांचे ऐकत नाहीत, असे मोदी म्हणाले होते. याबाबत गेहलोत म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदींचा सरकारी कार्यक्रम असल्याने मी त्यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉलनुसार हजर होतो. परंतु, प्रत्यक्ष कार्यक्रमाला मी उपस्थित नसल्याने ते काय म्हणाले हे मला माहीत नाहीत. मोदी आणि अमित शहा हे केवळ दुसऱ्याला दोष देण्यातच समाधान मानतात.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.