कोल्हापूर : या वर्षीच्या गळीत हंगामात एकरकमी एफआरपी देण्याबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये एकमत झाले आहे. उद्या (रविवार) साखर कारखान्यांकडून ऊसतोडी दिल्या जातील आणि सोमवारपासून साखर कारखाने सुरू केले जातील, अशी माहिती माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी साखर कारखानदारांच्या वतीने दिली.
आवाडे म्हणाले, या वर्षी साखरेच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे ऊसाला एफआरपी देणेही कठीण आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने केलेले मागणी पाहता या फार अधिक दोनशे रुपये ही मागणी पूर्ण होणे शक्य नाही. यावर कारखानदारांनी यावर्षीच्या हंगामात एक रकमी एफआरपी दिली जाणार आहे. तसेच भविष्यात साखरेचे दर वाढले तर आणखी काही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल. यावर सर्वच साखर कारखानदारांनी आपले एकमत केले. शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यकर्त्यांनी कारखानदारांशी चर्चा केली. या चर्चेमध्ये एक रकमी एफआरपी देण्याबाबतही एकमत झाल्याचे आवाडे यांनी सांगितले. त्यामुळे उद्या शेतकरी संघटनेचे आंदोलन असल्यामुळे कारखाने बंद ठेवले जातील. केवळ ऊसतोडी दिल्या जातील. पण सोमवारपासून सर्व कारखाने आणि ऊसतोडीही सुरू होतील, असेही आवाडे यांनी सांगितले.
यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतीश पाटील, संजय मंडलिक, माजी आमदार पी. एन. पाटील तसेच साखर कारखान्यांचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.