जैवविविधता समिती स्थापनेचा निर्णय होणार "या' दिवशी

जैवविविधता समिती स्थापनेचा निर्णय होणार "या' दिवशी

 
सोलापूर ः जैवविविधता समिती स्थापनेसंदर्भातील विषयावर निर्णय घेण्यासाठी महापौर शोभा बनशेट्टी यांनी सोमवारी (ता.25) सभा बोलावली आहे. या समितीवर सात नगरसेवकांसह इतर क्षेत्रातील तज्ज्ञांना जाण्याची संधी मिळणार आहे. 

समिती स्थापनेसाठी फेब्रुवारी 2020 पर्यंत मुदत 
फेब्रुवारी 2020 पूर्वी ही समिती स्थापन झाली नाही तर महपालिकेस दरमहा दहा लाख रुपये दंड भरावा लागणार असल्याचे पत्र शासनाकडून पाठविण्यात आले होते. हा प्रस्ताव येऊनसुद्धा त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. त्या संदर्भात बुधवारी "सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध झाली. त्याची दखल घेत येत्या तहकूब झालेली महापालिकेची सभा सोमवारी बोलावण्यात आली आहे. तीत ही समिती स्थापन करण्यावर निर्णय होईल. 

समिती सदस्यांतून होणार अध्यक्षाची निवड 
या समितीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांतून अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक होईल. महापालिकेचा कार्यकाल असेल तिथंपर्यंत ही समिती अस्तित्वात राहणार आहे. 

` या ` ठिकाणी आहेत समित्या 
महाराष्ट्र तील मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नाशिक या महापालिकांनी आतापर्यंत समित्या स्थापन केल्या आहेत. उर्वरित महापालिकांमध्ये ही समिती अद्याप स्थापन करण्यात आली नाही. सोलापूर महापालिकेचाही त्यात समावेश आहे. ही समिती स्थापन न केल्यास महापालिकेस दरमहा 10 लाख रुपयांचा दंड होणार असून, तो प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करावा लागणार आहे. चंद्रभालसिंग विरुद्ध भारत सरकार दाव्यानुसार राज्यातील महापालिकांमध्ये जैवविविधता समिती स्थापन कराव्यात आणि नोंदवह्याही अद्ययावत ठेवाव्यात असा आदेश शासनाने दिला आहे. या संदर्भात न्यायालयाने 9 ऑगस्ट 2019 रोजी आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने या समित्या स्थापन होणे आवश्‍यक आहे. 

जैवविविधता समिती स्थापण्यामागचा उद्देश 
शहरामध्ये वाहणाऱ्या नद्यांचे, नाल्यांचे प्रदूषण, त्यामुळे नष्ट होणारे जलचर प्राणी, तसेच चिमण्या, किडा, मुंगी यांचे अस्तित्व निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हे जीव वाचवण्यासाठी महापालिकेने जैव विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करावी लागणार आहे. माणसाच्या शाश्‍वत अस्तित्वासाठी निसर्गात जैवविविधता असणे अत्यंत आवश्‍यक आहे. कित्येक नैसर्गिक प्रक्रियांमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. पाण्याचे व हवेचे शुद्धीकरण, परागीभवन, उत्सर्जित केला जाणारा कार्बन डायऑक्‍साईड शोषून घेणे, नैसर्गिक व जैविक कीड नियंत्रण या प्रक्रियामुळेच मानवी जीवन सुसह्य होते. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या पर्यावरणाचा समतोल बिघडवत चालली आहे. त्यावर नियंत्रणासाठी ही समिती अत्यावश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com