पंढरपूरमधील पूर ओसरल्याने नागरिकांना दिलासा

Pandharpur-Flood
Pandharpur-Flood

पंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेले पाणी कमी करण्यात आलेले असल्याने पंढरपूर शहरातील पाण्याची पातळी आज (गुरुवार) कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रदक्षिणा रस्त्यावर आलेले पाणी पूर्णपणे ओसरले आहे.

काल (बुधवार) रात्री दहा वाजेपर्यंत पंढरपूर येथे पाण्याची पातळी वाढत होती. त्यानंतर पाण्याची पातळी स्थिर झाली आणि मध्यरात्रीपासून पाणी हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली.

काल रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील भजनदास चौक, घोंगडे गल्ली, सरकारी दवाखाना, गोविंदपुरा या भागांमध्ये पाणी आले होते. या भागातील पाणी आज कमी झाले आहे. प्रदक्षिणा रस्त्यावरील पाणी पूर्णपणे ओसरले होते.

तथापि, आज उजनी धरणातून दुपारी बारा वाजता 1 लाख 20 हजार आणि वीर धरणातून 62 हजार क्‍युसेक पाणी सोडले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com