सांगली - मराठवाड्यातील निलंगा येथे १२ डिसेंबरला रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्त्वात दुष्काळी परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या प्रचारासाठी सहा डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर यात्रा निघणार आहे.
शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न, गोवंश हत्याबंदी यासारख्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटना सरकारविरोधात राज्याच्या वेगवेगळ्या भागात सभा घेणार आहे.
सहा डिसेंबरपासून पश्चिम महाराष्ट्रातून या सभांना सुरूवात होईल. याचा शेवट मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिषदेने होणार आहे. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या येडे मच्छिंद्र गावापासुन दुष्काळी परिषदेच्या प्रचार यात्रेस प्रारंभ होईल. ही यात्रा शिरोळ, शाहूवाडी, शिराळा, इस्लामपूर, आष्टा, मिरज, कवठेमहांकाळ, सांगोला, मंगळवेढा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूरमार्गे निलंग्यात पोचेल. निलंगा येथे १२ डिसेंबरला दुष्काळी परिषद होईल.
आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळाचा समावेश करून एकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, गोवंश हत्या बंदी, वन्य जीव संरक्षण, पाळीव प्राण्यांची निर्दयी वागणूक, आवश्यक वस्तू कायदा, भूसंपादन, कमाल जमीन धारणा इत्यादी शेतकरी विरुद्ध कायदे रद्द करावेत, अशी आमची मागणी आहे.
- रघुनाथ पाटील
प्रमुख मागण्या -
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.