ऐन अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा

Drought relief to farmers during difficult times
Drought relief to farmers during difficult times

मोहोळ - एप्रिल व मे या दोन महिन्यात मोहोळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने केळी व डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने 79 हेक्टर क्षेत्रासाठी 122 लाभार्थ्यांना बारा लाख रुपये रक्कम नुकसान भरपाईपोटी त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन अडचणीच्या काळात दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, एप्रिल व मे 2018 या वर्षात मोहोळ तालुक्यात अवकाळी पाऊस झाला होता या पावसाने तालुक्यातील 12 गावातील 122 शेतकऱ्यांचे केळी व डाळिंब खरबूज पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, सर्वात जास्त नुकसान केळीचे झाले होते शेतकऱ्यांनी याबाबत महसूल प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने ग्रामसेवक तलाठी व कृषी सहाय्यक यांचे पथक नेमून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते पथकाने पंचनामे करून अहवाल शासनाला सादर केला होता त्यानुसार शासनाने 79.15 क्षेत्र नक्की करून त्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग केले आहे.

गावे निहाय नुकसानीचे क्षेत्र पुढीलप्रमाणे : 
कोरवली - 6.60 हेक्टर, हराळवाडी - 11.80, कुरुल - 20 आर, देवडी - 7 आर, आष्टी - 12.90, खंडाळी - 4.35, चिखली - 40 आर, पाटकुल - 26.10, एकुरके - 3.70, बोपले - 3 हे, टाकळी सिकन्दर - 1.88, कुरणवाडी - 5.70

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com