बेळगाव : भाजपच्या कारवायांना घाबरणार नाही - सतीश जारकीहोळी
बेळगाव : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व नेते राहुल गांधी यांना इडीचे समन्स हे राजकीय षड्यंत्र असून भाजपने कितीही भीती घालण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही. कोणत्याही समस्येवर कायदेशीर लढा देऊ, अशी स्पष्टोक्ती प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिली. येथील काँग्रेस भवनात गुरुवारी (ता. १६) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, इडी, सीबीआयने भाजपच्या अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, केंद्र सरकार काँग्रेस नेत्यांना लक्ष्य बनवित आहे. काँग्रेस नेत्यांना समन्स जारी करुन पक्षाला दुर्बल बनविण्याचा प्रयत्न कदापि सफल होणार नाही.
महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांवर छापे घालण्यात आले असून अशा प्रकरणांना कायदेशीरपणे सामोरे जाणेच योग्य ठरेल. काँग्रेसमध्ये गटबाजी नाही. सर्वजण एकजुटीनेच पक्षकार्य करीत आहोत. काही नेत्यांचे वैयक्तिक विचार वेगळे असतील. मात्र, निवडणुकीवेळी एकत्र येऊनच कार्य केले आहे. त्यामुळेच वायव्य शिक्षक मतदारसंघातून प्रकाश हुक्केरींना भरघोस यथ मिळाले, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, प्रदेश काँग्रेसचे कार्यवाह सुनील हनमण्णवर उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.