विद्यार्थ्यांच्या पालकांकडून कर्जाची वसुली

Education-Loan
Education-Loan

सोलापूर - मागील पाच वर्षांत बॅंकांना २१ लाख ८४ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले. परंतु, राज्यातील वाढलेल्या सुशिक्षित बेरोजगारीमुळे बॅंकांनी शैक्षणिक कर्जवाटपात हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे. एकूण उद्दिष्टापैकी फक्‍त पाच लाख २२ हजार विद्यार्थ्यांनाच बॅंकांकडून अर्थसाह्य मिळाले आहे. दरम्यान, बेरोजगारीमुळे विद्यार्थ्यांच्या नोकरीची प्रतीक्षा न करताच बॅंकांनी आता कर्जाची वसुली त्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सुरू केल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या (एसएलबीसी) सूत्रांनी सांगितले.

सरकारच्या निर्देशानुसार बारावीच्या परीक्षेत ६० टक्‍के अथवा त्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बॅंकांकडून कर्जाच्या रूपाने अर्थसाह्य केले जाते. मात्र, दिवसेंदिवस वाढत असलेली बॅंकांची थकबाकी आणि घटलेले नोकऱ्यांचे प्रमाण, या पार्श्‍वभूमीवर बॅंकांनी कर्जवाटपात सावध पवित्र घेतल्याचे चित्र पाहायला मिळते. मागील पाच वर्षांत शैक्षणिक कर्जाची सुमारे ४५ टक्‍केच वसुली झाली आहे.

दरम्यान, प्रयत्न करूनही मुलाला नोकरी मिळेना, व्यवसाय सुरू केला; परंतु दुष्काळामुळे ग्राहक नाहीत, अशी विविध कारणे पालकांकडून सांगण्यात येतात. त्यामुळे नाशिक, औरंगाबाद, जालना, यवतमाळ, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, गडचिरोली, अकोला, जवळगाव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याचे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com