उसाबाबतची 'ही' गोष्ट राजू शेट्टी यांना अमान्य

Ex MP Raju Shetti Comments On Sugarcane Rate Issue
Ex MP Raju Shetti Comments On Sugarcane Rate Issue

सांगली - गेली दोन वर्षे केंद्राच्या फसव्या धोरणांमुळे उसाची एफआरपी वाढली नाही. दुष्काळ, महापूर, अतिवृष्टीमुळे राज्यातील उसाचे उत्पादन घटले आहे. या परिस्थितीत एफआरपी अधिक दराच्या मागणीसाठी सरकारने मदत द्यावी. ऊस दराच्या मागणीाबबत जयसिंगपूर परिषदेत धोरण ठरवू. शेतकऱ्यांनी या परिस्थितीचा लाभ उठवायला हवा. साखर कारखानदारांनी साथ द्यावी, असे आवाहन स्वाभामानीचे नेते राजू शेट्टी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. अवकाळीच्या नुकसानीनंतर 67 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्देवी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जयसिंगपूर येथे शनिवारी ( ता. 23) होणाऱ्या ऊस परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. संघटनेचे रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष महेश खराडे यावेळी उपस्थित होते. 

उसाला राज्यबंदी आम्हाला अमान्य

शेट्टी म्हणाले, " यंदाची ऊस परिषद एका वेगळ्या स्थितीत होत आहे. आधी दुष्काळाने आणि नंतर महापुराने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे. उत्पादकता घटल्याने साखर उत्पादनही निम्म्याने घटण्याची शक्‍यता आहे. देशातील स्थितीही काही प्रमाणात अशीच आहे. गरजेइतके साखर उत्पादन होणार असल्याने परदेशातून साखर आयात होऊ देणार नाही. परिणामी भाव स्थिर राहतील किंवा वाढतीलही. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चार पैसे जादा मिळतील. उसाला राज्यबंदी आम्ही मानत नाही. शेतकऱ्यांना अधिक दर मिळत असेल तर बंदी गैरवाजवी आहे." 

एफआरपी वाढीसाठी कृषीमूल्य आयोगासोबत बैठक

शेट्टी म्हणाले, "गतवर्षी एफआरपी दिलेली नाही. त्यांना गाळप परवाने देऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे. अन्यथा असे कारखाने बंद पाडू. यंदा ऊस पूरात सापडल्याने उतारा कमी राहिल. परिणामी, पुढील वर्षी एफआरपी कमी मिळणार आहे. एफआरपी वाढीसाठी कृषीमूल्य आयोगासोबत बैठक घेणार आहे. शेतकऱ्यांनी संयम पाळल्यास हा दर आणखी वाढून मिळणे शक्‍य आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. ते उसाच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. ऊस परिषदेमध्ये महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकरी जो निर्णय घेतील, तो शासनाला मान्य करावा लागेल.'' 

शिवआघाडीकडून शेतकरी केंद्रीत निर्णय हवेत

माजी खासदार शेट्टी म्हणाले," सरकार कोणाचेही सत्तेत आले तरी आमची लढाई सुरुच राहणार आहे. भाजपने शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा केल्याने महाशिवआघाडी सरकारबाबत उत्सुकता आहे. शेतकरी केंद्रस्थांनी ठेवून कर्जमाफी, वीजबीलमाफी, शेतमालाला दराच्या निर्णयासाठी आम्ही आघाडीशी जुळवून घेवू. समान कार्यक्रमांतर्गत अंमलबजावणीबाबत आग्रही राहू.' 

शेट्टी म्हणाले... 
0 अवकाळी पाहणीस एनडीआरएफ पथक पाहणीला विलंव 
0 नैसर्गीक आपत्तीसाठी खासगी ऐवजी सरकारीच विमा कंपन्या हव्यात.

.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com