एकरी दोन हजारे भरूनही पाणी मिळेना; मिरज पूर्व भागातील चित्र

AAR20A00206.jpg
AAR20A00206.jpg

आरग ( सांगली) : नेहमीच दुष्काळी भागाला जीवनदायी ठरणारी म्हैसाळ योजना साडे तीन महिन्यापर्वी सुरू झाली. पण, या वर्षी मिरज पूर्व भागातील शेतकरी अद्याप पाण्यापासून वंचित आहे. योजनेची एकरी दोन हजारे प्रमाणे पाणी पट्टी भरून सुध्दा पाणी न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. पाणी उशाला आणि कोरड घशाला अश्‍या परिस्थिती मुळे पूर्व भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


पूर्व भागात लोकप्रतिनिधींनी दौरा केला दुष्काळी भागातील शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या. दोन चार दिवसात पाणी सोडण्याची पोकळ आश्वासने देण्यात आली.पण महिना उलटला तरी अद्याप पाणी शिवारात आले नाही. गावातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली पण अद्याप पाणी आले नाही. पाणी येणार या आशेवर शेतकरी जगीत आहे. 


वाढत्या तापमानामुळे या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाई जाणवत आहे. मे महिना संपत आला तरी पाण्यासाठी घसा कोरडाच आहे. पूर्व भागातील संपूर्ण गावात पाणी पुरवठा करणाऱ्या विहारी अखेर कोरड्याच राहिल्या. योजना गावाच्या दाराशी आहे. पण पिण्यासाठी पाणी नाही. भूजल पातळी खालावली. पिके करपली तसेच शेती साठी पाण्याची गरज आता आहे . पण पावसाळ्यात महापुराचे पाणी घेऊन काय करायचे असा सवाल आक्रमक शेतकरी करीत आहे. 


कोरोनाच्या महाभयंकर आपत्ती मध्ये येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पाणी सोडण्याची जोरदार मागणी केली जात असून पूर्व भागात दौरा केलेल्या लोकप्रतिनिधींच्या कडून फक्त बघ्याची भूमिका होत आहे. 


गत वर्षी मे महिना लोटला तरी पाणी सोडण्यात आले नाही. पाण्यासाठी समस्येत वाढ होत असून पूर्व भागाला कोणी वाली आहे का नाही असा असा सवाल आक्रमक शेतकरी करीत आहेत. होरपळलेल्या पिकांना आधार देण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी आमची आहे. 
- दाजी खोत माजी सरपंच लक्ष्मिवाडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com