‘बळिराजानं कसं जगायचं?’

Vegetable-Market-Rate
Vegetable-Market-Rate

सोलापूर - कमी कालावधीचे पीक म्हणून कांदा केला... सध्या चांगला भाव नसल्याने खर्चसुद्धा निघेना... शेतात तरी किती दिवस ठेवायचा. अक्षरश: जागेवर नासू लागलाय... दुष्काळातही कांद्याला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कसं जगायचं...अशी व्यथा माळकवठा (ता. दक्षिण सोलापूर) येथील शोभा पाटील यांनी व्यक्त केली.

राज्यात यंदा कमी पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती आहे. सुरवातीपासूनच कमी पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली; परंतु आता त्याचे दर पडले आहेत. क्विंटलला २६० ते ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यातून खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आले आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या कांदा काढण्याचे काम सुरू आहे. दिवाळीनंतरही कांद्याचा दर वाढलाच नाही. त्यामुळे अनेकांचा कांदा शेतात पडला आहे. गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे कांदा नासू लागला आहे. 

शोभा पाटील म्हणाल्या, ‘‘शेतात तरी किती दिवस कांदा ठेवायचा. सध्याच्या दरातून झालेला खर्च तर निघणार नाहीच, परंतु बाजार समितीपर्यंत नेण्याचे वाहन भाडे निघेल की नाही, अशी शंका आहे. शेतात काम करणाऱ्या महिला मजुराला १५० रुपये हजेरी आहे. कांद्याचे एक पोते बाजार समितीपर्यंत नेण्यासाठी ३०-४० रुपये खर्च येतो. घरची माणसं तीन महिने मशागत करतात. होणारा खर्च निघणेही अवघड झाले आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com