माढा (सोलापूर) : कृषी विद्युतपंपाना उच्च दाब वितरण प्रणालीद्वारे (एच. व्ही. डी. एस.) स्वतंत्र विद्युत जनित्रासह वीजजोड देण्यात येत असल्याने विजेचा दाब कमी-जास्त होणे यामुळे बंद होणार असून वीजगळतीही नियंत्रणात येणार आहे. वीजगळती, वीजचोरी या प्रकाराला आळा बसणार आहे.
वीज वितरण कंपनीकडून राज्यामध्ये सध्या कृषी विद्युत पंपांना एल. टी. प्रकारातील वीजजोड देण्याची प्रक्रिया सुमारे वर्षभरापासून बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे कृषी पंपांना वीज जोडणी देण्यामध्ये अडचणी येत आहेत. मात्र वीज वितरण कंपनीने एच. व्ही. डी. एस. प्रणालीद्वारे कृषी विद्युत पंपांना वीज जोड देण्याचे काम वेगाने सुरू केले आहे.
हेही वाचा- माढ्यात भाजपची ताकद क्षीण... हे आहे प्रकरण
शेतकऱ्यांना उच्च दाबाची वीज
या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र विद्युत जनित्र ( डी.पी. ) दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या अश्वशक्तीप्रमाणे वीज वितरण कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करून कोटेशन भरावे लागते. शेतकऱ्यांना केवळ अश्वशक्ती प्रमाणे कोटेशनचा खर्च भरावा लागणार आहे. विद्युत जनित्र, त्याची उभारणी याबाबतचा सर्व खर्च वीज वितरण कंपनीने नेमलेले ठेकेदार करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगळा खर्च करायचा नाही. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उच्च दाबाची वीज जोड मिळाल्यामुळे विदयुत दाब कमी-जास्त होऊन विद्युतपंप जळणे, पाणी उपसा करण्यामध्ये अडथळा निर्माण होणे यासारख्या गोष्टी टळणार आहेत. मात्र अशा कृषी पंपांना मीटर प्रमाणेच वीजबिल आकारले जाणार आहे. तसेच वीज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे, प्रसंगी विद्युत जनित्रही काढून नेली जाऊ शकतात. पूर्वी अश्वशक्ति प्रमाणे वीज बिल येत असल्यामुळे विजेचा कमी अधिक वापर शेतकर्यांना करता येत होता आता मात्र शेतकऱ्यांना मीटर प्रमाणे विज बिल येणार असल्याने नियंत्रित प्रमाणातच विजेचा वापर करावा लागणार आहे.
यामुळे कृषी पंपाचे शेतकर्यांना नियमित वीज बिल भरावे लागण्याची शक्यता आहे. या प्रणालीद्वारे विद्युत पंप मिळण्यासाठी अर्ज केलेल्या माढा तालुक्यातील ५०९ कृषी वीजग्राहकांपैकी ३१७ वीजोड देण्यात आले आहेत. मात्र बऱ्याच विद्युत पंपांचा वीजपुरवठा अद्याप सुरू केलेला नाही.
हेही वाचा- लेझर शोद्वारे उलगडले श्री सिद्धेश्वरांचे जीवनचरित्र
नव्या प्रणालीचे शेतकऱ्यांना होणारे फायदे
वीज वितरण कंपनीसाठी फायदेशीर
ठेकेदाराला पैसे देईचे नाहीत...
एच. व्ही.डी.एस. या नव्या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोड देण्याचे काम सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांनी यासाठी कोणत्याही व्यक्तीला अथवा ठेकेदाराला पैसे द्यायचे नाहीत. याबाबतचा सर्व खर्च ठेकेदार करणार आहेत. या प्रणालीमुळे चांगल्या विद्युत दाबाने कृषिपंपांना वीजपुरवठा होणार आहे. टेक्निकल व नियमित वीजगळती ही थांबणार आहे. मार्चअखेरपर्यंत या प्रकारातील प्रतीक्षा यादीवरील उर्वरित १९२ कृषीग्राहकांना वीजोड देण्यात येणार आहेत. काही ठिकाणी तपासणीची कामे राहिल्याने या प्रणालीद्वारे वीजोड दिलेले नाहीत. ते तातडीने देण्याचा प्रयत्न करणार आहे.
- महेश लोखंडे, उपकार्यकारी अभियंता,
वीज वितरण कंपनी, माढा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.