मंगळवेढा : वडापूर बंधाऱ्याचे दरवाजे गेले वाहून

plate.jpg
plate.jpg

मंगळवेढा : खबरदारीचा उपाय म्हणून जून ते ऑक्‍टोबर दरम्यान वडापूर बंधाऱ्यावर काढून ठेवलेले दरवाजे पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे भीमा नदीला आलेल्या पुरात वाहून गेले आहेत.

त्यामुळे भविष्यात या भागातील बागायत शेतीला याचा मोठा फटका बसणार आहे. या बंधाऱ्याच्या साडेसातीचे संकट काही संपता संपेना गत जुलै महिन्यात त्याचा भराव वाहून गेला होता. पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात  उजनी व वीर धरणाच्या लाभक्षेत्रात पडलेल्या पावसामुळे उजनीतून 30 हजार तर वीरमधून 54 हजार 478 क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात  आले. 

दरम्यान, पाटबंधारे खात्याने खबरदारीचा उपाय म्हणून या काळात हे दरवाजे उचलून ठेवले, पण ते सुरतक्षित ठिकाणी न ठेवल्याने ह्यातील काही दरवाजे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर पाणी साठवण्याच्या दृष्टीने पाटबंधारे खात्याकडून मंजुरी घेऊन नवीन दरवाजे करण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्यामुळे या भागातील शेतीला पाणी टंचाईचे संकट जाणवणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com