कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या : जयंत पाटील

Give Bharatratna to Karmaveer Bhaurao Patil says Jayant Patil
Give Bharatratna to Karmaveer Bhaurao Patil says Jayant Patil

इस्लामपूर : बहुजन समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक जडणघडणीत मोलाचा हातभार लावून सर्वसामान्यांचे स्थान उंचावण्याचे काम करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांना केंद्र शासनाने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करावा या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

पाटील म्हणाले, "कर्मवीर अण्णांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता शैक्षणिक चळवळ उभी केली. आज महाराष्ट्र शिक्षण आणि ज्ञानाच्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. त्यात कर्मवीर अण्णांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक प्रगतीचा पाया त्यांनी रोवला. त्यामुळे शाळा निघू लागल्या. बहुजन समाजाला ज्ञानाची कवाडे कायमची खुली झाली. सर्वसामान्यांचे जीवनमान निश्‍चित उंचावले. बनारस विद्यापीठाचे संस्थापक मदनमोहन मालवीय यांना यापूर्वी केंद्र शासनाने भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविले.

महाराष्ट्रात शिक्षणाचा श्रीगणेशा महात्मा फुले यांनी केला. त्यापाठोपाठ खेडोपाड्यात जाऊन, युवकांना संघटित करुन शिक्षण देण्याचे काम कर्मवीर अण्णांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून भारतरत्नसाठी महाराष्ट्र राज्यातर्फे केंद्राकडे शिफारस करावी यासाठी विनंती करत आहे.

पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीबाबत ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विश्‍वजित कदम यांना पाठिंबा देत असताना अरुण लाड व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पाठिंबा दिला आहे. विश्‍वजित कदम हे या निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून येतील यात शंका नाही.'' 

प्रदेशाध्यपदाच्या निवडीनंतर पक्षाच्या धोरणासंदर्भात ते म्हणाले, "राष्ट्रवादी पक्ष बांधणीला प्राधान्य दिले जाईल. प्रत्येक बुथवर पोहचण्याचे काम केले जाईल. प्रशिक्षित आणि चांगल्या विचाराचा कार्यकर्ता उभारण्याला प्राधान्य दिले जाईल. येत्या दोन-तीन महिन्यात बदल होतील. हल्लाबोल मोर्चाचा चौथा टप्पा दोन तीन दिवसांत सुरु होईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com