डॉ. कोल्हे म्हणतात, "कोरोना'बाबत सरकारला उशिरा जाग :

 Government awakens late on "Corona": Dr. Kolhe
Government awakens late on "Corona": Dr. Kolhe

श्रीरामपूर ः ""कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा इतका बाऊ करण्याची गरज नाही. परदेशातून आलेल्या लोकांमुळे या विषाणूचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे. सरकारने परदेशातून येणाऱ्यांबाबत वेळीच निर्णय घेऊन त्यांना "आयसोलेशन', "क्वारंटाईन' करणे गरजेचे होते. तसे केले असते, तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्याची वेळ आली नसती. सरकारला उशिरा जाग आल्याने सामान्यांचे हाल होत आहेत,'' असे मत डॉ. रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केले. 

डॉ. कोल्हे यांनी आज तालुक्‍यातील गोंडेगाव, पढेगाव, कारेगाव येथील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. "कोरोना'बाबतच्या अफवांना बळी न पडता, सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करीत डॉ. कोल्हे म्हणाले, ""अपघातात अनेक जण मृत्युमुखी पडतात. क्षयरोग, डायरिया, कुपोषणासारख्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेत "कोरोना'ने होणारे मृत्यूंचे प्रमाण अल्प आहे. सध्या अन्य आजारांकडे दुर्लक्ष करून "कोरोना'ची धास्ती घेतली जात आहे. सरकार भाजीबाजार, मंगल कार्यालये, हॉटेले, वाहतूक सेवा बंद करीत आहे. त्याचा मालकांवर परिणाम होत नसला, तरी त्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजुरांना संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे.'' 

"सरकारने परदेशांतून येणाऱ्या नागरिकांना विमानतळावरच "आयसोलेशन' अथवा "क्वारंटाईन' केले असते, तर आज एवढी बंधने घालण्याची वेळ आली नसती. यापूर्वी स्वाईन फ्लू, बर्ड फ्लूसारख्या आजारांमधून औषध कंपन्यांचे लागेबांधे समोर आले होते. तसे या आजाराबाबत होऊ नये. पुढील काळात कोणत्या औषध कंपन्यांचे शेअर कोण विकत घेतो, यावर माध्यमांनी लक्ष ठेवावे,'' असे आवाहन त्यांनी केले. 

""मुंबई व पश्‍चिम महाराष्ट्राच्या महसुलावर विदर्भाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे विदर्भ आर्थिकदृष्ट्या परावलंबी बनला आहे. विदर्भ स्वतंत्र राज्य झाल्यास, तेथील नागरिक नव्या उमेदीने वाटचाल सुरू करतील. त्यांना त्यांची जबाबदारी कळेल. प्रारंभी चुकतील; पण त्यांना आपली दिशा मिळेल. मात्र, स्वतंत्र विदर्भाबाबत राजकीय इच्छाशक्ती असणे आवश्‍यक आहे,'' असे डॉ. कोल्हे म्हणाले. ऍड. नारायण तांबे या वेळी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com