बेळगाव : शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना ग्राम वास्तव्य करण्याचे आदेश

महसूल मंत्री अशोक यांनी याचे सूतोवाच केले आहे
Ashok Chavan
Ashok ChavanSakal

बेळगाव - शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना ग्राम वास्तव्य करण्याचे आदेश बजावले आहेत. आता त्यापाठोपाठ जिल्हाधिकारी दर आठवड्याला एका तालुक्यात थांबून आपले काम पाहणार आहेत. महसूल मंत्री अशोक यांनी याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे लवकरच याबाबतचा आदेश देखील बजावला जाणार आहे. राज्य शासनाने ग्राम वास्तव्य ही संकल्पना पुढे आणत प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांनी एक गाव निवडून त्या ठिकाणी ग्राम वास्तव्य करण्याचे आदेश बजावले आहेत. यासह प्रत्येक तहसीलदारांना देखिल महिन्यातून एक दिवस ग्रामवास्तव्य करावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर विविध खात्याचे अधिकारी देखील ग्राम वास्तव्यात सहभागी होत असून त्याच ठिकाणी कार्यक्रम घेऊन लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जात आहे. लोकांना‌ देखील जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीसाठी जिल्हा केंद्रावर यावे लागत नसून आपल्या गावातच आपल्या तक्रारींचे निवारण करून घेता येत आहे.

आता त्यापाठोपाठ शासनाकडून नव्याने आदेश बजावला जाणार असून यात प्रत्येक आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांना एका तालुका केंद्रावर थांबून आपले काम पहावे लागणार आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण १४ तालुके असून जिल्हाधिकाऱ्यांना यापैकी एक तालुका निवडत आठवड्यातून एक दिवस सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत त्या तालुक्यात थांबून सर्व काम पहावे लागणार आहे. प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा आणण्यासह विविध तालुक्यातील लोकांना जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीसाठी जिल्हा केंद्रावर येण्याऐवजी त्यांच्या संबंधित तालुक्यातच जिल्हाधिकारी उपलब्ध व्हावेत, हा यामागील उद्देश आहे. यामुळे जिल्हाधिकार्‍यांना देखील संबंधित तालुक्यातील समस्यांची जाणीव होणार आहे. जावळे जिल्हाधिकारी स्वत त्यावर तोडगा काढू शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com