द्राक्ष पेटीचे दर २५० वरून १५० वर घसरले

द्राक्ष पेटीचे  दर २५० वरून १५० वर घसरले

तासगाव - उत्तर भारतातील थंडीची लाट, बाजारपेठेत मागणी नसल्याने हंगामाच्या सुरवातीलाच द्राक्षांचे चार किलोच्या पेटीचे दर २५० वरून थेट १५० रुपयांवर आल्याने द्राक्षउत्पादक शेतकरी हडबडले. निर्यातक्षम द्राक्षांचे पडलेले दर, पश्‍चिम बंगालमधील अस्थिरता अशी संकटेही आल्याने दलालांचे ट्रक जागेवरच थांबून असल्याचे चित्र आहे.

द्राक्षावर नैसर्गिक संकटे नेहमीचीच. मात्र, यंदा हंगामाच्या सुरवातीलाच अस्थिर बाजारपेठेचे संकट आले आहे. उत्तर भारत सर्वांत मोठी बाजारपेठ. मात्र, अजून तिकडे थंडी आहे. त्यामुळे द्राक्षांना उठाव नाही. पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या तणावाचे सावट आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर नेपाळ, बांगलादेशच्या सीमा १५ दिवस बंद असतात. त्यामुळे जाणारी द्राक्षे थांबलीत. याचा परिणाम द्राक्ष हंगामावर झाला. दर अचानक कोसळले. उठाव नसल्याने दलालांकडून खरेदी कमी झाली. वाहतूक करणारे ट्रक जागेवरच उभे आहेत. तासगाव, मणेराजुरी, सावळज भागात असेच चित्र आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावला जाऊ नये म्हणून शेतकरी दलालांमागे लागले आहेत. मागणी कमी, पुरवठा जास्त याचा फटका बसण्याचा धोका आहे. दर कोसळल्याने बसणारा फटका एकरी लाखावर आहे.   

चार किलोच्या पेटीचे दर असे...
सोनाका माणिक चमन १५०-१६०, सुपर १४०-१५०, काळ्या रंगाची शरद ज्योती २००-२२५ असे दर सध्या मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५०-७५ रुपयांचा फटका बसला आहे. 

निर्यातक्षम द्राक्षांचे दर घटले
१८ जानेवारीनंतर दुबई, चीन, थायलंड, श्रीलंकेत निर्यात होणाऱ्या द्राक्षांचे दर चक्क ४५ रुपये किलोवर आलेत. त्याचाही परिणाम देशांतर्गत दरावर झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com