सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत 'हाजापूर' प्रथम क्रमांकावर

Hajarapur.jpg
Hajarapur.jpg

मंगळवेढा : पाणी फाउंडेशन च्या वतीने दुष्काळमुक्त गावासाठी राबविण्यात येत असलेल्या चौथ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यामध्ये 'हाजापूरने' प्रथम क्रमांक मिळवला. नंदेश्वरने दुसरा तर डोंगरगावने तिसरा क्रमांक मिळवला. पाण्यासाठी शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहण्यापेक्षा सरणावर लोकांचा अलीकडच्या काळात सहभाग वाढू लागल्याने पाणी फाऊंडेशनची चळवळ तालुक्यांमध्ये जोर धरू लागली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी श्रमदानाच्या माध्यमातून दुष्काळमुक्त करण्यासाठी अभिनेते आमिर खान यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने पाणी फाऊंडेशनच्या सुरू केले. या स्पर्धेमध्ये तालुक्यांमध्ये नागरिकांचा सहभाग उस्फूर्तपणे वाढत आहे. यावर्षी या स्पर्धेसाठी 56 गावांनी नोंदणी केली होती यासाठी 47 गावातील ग्रामस्थांनी यासाठीचे प्रशिक्षण घेतले होते. पण 39 गावानी प्रत्यक्ष काम करण्यास सुरुवात केली. 8 एप्रिल ते 27 मे 2019 या 45 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 'हाजापूरने' नऊ हजार पेक्षा अधिक घनमीटर काम श्रमदानातून केले तर 97 हजार घनमीटर काम यंत्राव्दारे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com