पाणी न सोडल्यास आंदोलन उपोषण करण्याचा इशारा

shaila-godse
shaila-godse

मंगळवेढा - तालुक्यांमध्ये दुष्काळी तिव्रता जाणवू लागली असुन, शासकीय उपाययोजना अजुन कागदावर आहेत. अशा परिस्थितीत जलसंपदामंत्र्याच्या बैठकीत व पालकमंत्री व लोकप्रतिनिधीच्या दौऱ्यात पाणी लवकरच पाणी येणार असल्याचा दावा करण्यात आला. परंतु, ऐन दुष्काळात पाणी येण्यास विलंब होत. असल्याने जि.प. सदस्या शैला गोडसे यांनी पाणीप्रश्नी उडी घेतली. 25 नोव्हेंबर पूर्वी पाणी न सोडल्यास आंदोलन उपोषण करण्याचा इशारा दिला त्यामुळे तालुक्यामध्ये पाण्यावरून राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली.

या भागातील 12 गावाचा समावेश असलेल्या म्हैसाळच्या योजनेचे पाणी अजून आले. निधीअभावी रखडलेल्या योजनेस निधी मिळावा म्हणून स्थानिक आमदारांनी प्रयत्न केले. तर सरकारने निधी उपलब्ध केला. पण सध्या दुष्काळामुळे हातातील पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला. अशा परिस्थितीत या भागाला कोरडवाहूचा दर्जा द्यावा अशी मागणी आता जोर धरत आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हे पाणी 20 आक्टोबर पूर्वी शिरनांदगी तलावात सोडण्याचे आदेश दिले होते परंतु ही तारीख निघून गेली. त्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख आमदार प्रशांत परिचारक यांनी या कामाची पाहणी केली. याशिवाय भारत भालके यांनी देखील पाहणी करून लवकर येणार पाणी तलावात येणार असल्याचा दावाही केला. परंतु, अधिकाऱ्याकडून याबाबत निश्चित केलेल्या कालावधीत कारवाई होत. नसल्याने म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांकडून येथील पदाधिकाऱ्यांची आणि जनतेची दिशाभूल होत असल्याने सांगली येथे म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली मंगळवेढ्याच्या अगोदर सर्व तालुक्यातील नेते मंडळी कडून म्हैसाळचे पाणी पळवले जाताने आपणच का गप्प का ? दुष्काळी जनतेसाठी म्हैसाळचे शिरनांदगी तलावामध्ये पाणी येईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय शिवसैनिकाकडून घेण्यात आल्याने जि.प.सदस्या गोडसे यांनी हे निवेदन दिले. जलसंपदा अधिकाऱ्यांना देण्यात आली असून यावेळी नारायण गोवे नारायण गोविंद संजय नागणे लहू नवत्रे सुरेश काशिद विष्णू बनसोडे नामदेव शिंदे शंकर भगरे दया डावरे आंबरस घाडगे रोहित शिवशरण आदी शेतकरी उपस्थित होते. आता पैशाची पाण्यासाठी म्हैसाळच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे तालुक्यामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आंदोलने आणि त्याचे इशारे होऊ लागले पण प्रत्यक्षात पाणी कधी येणार याची उत्सुकता मात्र दुष्काळी भागातील जनतेला लागून राहिले आहे.

जलसंपदा मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत 20 ऑक्टोबर ही गेली. सध्या जत व सांगोला तालुक्यात या योजनेचे पाणी सुरू आहे. 25 ता.मागे पुढे होईल पण लवकरच आम्ही शिरनांदगी तलावात पाणी सोडू :- हणमंत गुणाले .अधीक्षक अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com