बुडाली जरी शाळा, तरी फडकवला झेंडा!

Sangli
Sangli

सांगली : शाळा आणि १५ ऑगस्ट यांचे अतूट नाते आहे. नुकत्याच आलेल्या कृष्णेच्या महापुराने या नात्यात दुरावा निर्माण केला. म्हणजेच सांगलीतील जवळपास २०८ शाळा पाण्याखाली गेल्या. ३६ वर्गखोल्या ढासळल्या. त्यामुळे १५ दिवस शाळा भरल्याच नाहीत. पण १५ ऑगस्टच्या सकाळी चिखलात माखलेल्या या शाळांमध्ये जाऊन, स्वच्छता करून शिक्षक, विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन केले आणि तिरंग्यावर असलेली निष्ठा व्यक्त केली.

पलूस तालुक्यातील सुरेगाव भिलवडीतील बोरबन शाळा आणि वाळवा शिराळा मिरज तालुक्यातील नदीकाठच्या भागात गेल्या १५ दिवसांपासून शाळा भरली नाही. तिथे महापुराने थैमान घातले. नदीकाठच्या २०८ शाळा पाण्याखाली गेल्या होत्या. त्यातील ३६ वर्ग खोल्या पडल्या. अनेक शाळांची वाताहत झाली. या शाळा दुरुस्त करून पुन्हा उभ्या करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपये लागणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव नुकताच जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे पाठवला आहे. 

हे सारे होत राहणार आहे मात्र, आज स्वातंत्र्यदिनी माझ्या शाळेसमोर तिरंगा झेंडा फडकला पाहिजे असा निश्चय शिक्षकांनी केला. गेल्या दोन दिवसांपासून शाळा परिसरात त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली. काही स्वयंसेवी संस्थांनी शिक्षकांना मदत केली आणि या शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने ध्वजवंदन झाले.
सुमारे पावणेदोनशेहून अधिक शाळांमध्ये आज अशा रीतीने ध्वजवंदन करून शिक्षकांनी कितीही संकटे आली तरी आम्ही लढण्यास तयार आहोत असाच संदेश जणू दिला.

प्राथमिक शिक्षकांनी अतिशय कष्टाने शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून आज स्वातंत्र्य दिन साजरा केला. बुडालेल्या सुमारे पावणेदोनशे शाळांमध्ये ध्वजवंदन झाले. काही शाळांची अवस्था खूपच बिकट आहे. तेथे ध्वजवंदन करणे शक्यच नव्हते. अशा शाळा राहिल्या, याचे दुःख वाटते.
- अविनाश गुरव, शिक्षक संघाचे पदाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com